शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

एकाच दिवशी धुळ्यात ८८ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काही वेळेस हलक्या स्वरुपात पडणारा पाऊस कुठे मुसळधार तर ...

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काही वेळेस हलक्या स्वरुपात पडणारा पाऊस कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परिणामी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस झाल्यानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतली. बुधवारी सकाळी मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह परिसरात बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यावरील उंचसखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागले. तर देवपुरातील कॉलनी परिसरात पाण्याचे डबके आणि चिखलाचे साम्राज्य तयार झाले होते. पावसामुळे रस्त्यावरदेखील वर्दळ तशी कमीच होती.

सुरुवातीला आलेला पाऊस तसा बारीकच हाेता; पण नंतर पावसाने जोर पकडला. बराचवेळ पावसाने जोरदार हजेरी लावली. रस्ते जलमय झाले होते. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यात पाणी साचले होते. वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागली होती. हंगामी व्यावसायिकांसह आग्रा रोडवरील लोटगाडीधारक व्यावसायिकांचे चांगलेच हाल झाले होते. देवपुरातील बऱ्याच काॅलनी परिसरात बऱ्याच ठिकाणी तर रस्तेदेखील नाहीत, त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील रहिवाशांना घराबाहेर पडणेदेखील मुश्किल झाले होते. पावसाने दिवसभरात कधी जोरात तर कधी हलक्या स्वरूपात हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.

व्यापारी संकुलात पाणी

शहरातील काही व्यापारी संकुलाची रचना ही तळघरापासून करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा परिणाम हा व्यापारी संकुलावर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समोर आलेले आहे. बहुतेक व्यापारी संकुलाच्या तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले. काहींनी दुकाने उघडलीच नाहीत. तर काहींनी दुकाने सुरु ठेवली होती. परिणामी दुकानात पाणी शिरले आणि लाखों रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले.

घरात शिरले पाणी

पावसाची संततधार ही सायंकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे बहुतेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यात मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरचा काही भाग, लक्ष्मणवाडी, भाईजी नगराचा समावेश करता येईल. हा परिसर उंचसखल असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने अनेकांच्या घरात शिरकाव केला. संसारोपयोगी साहित्य पाण्यात गेल्याने नुकसान झाले आहे.

रस्त्यावर साचले पाणी

पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याचा निचरा बऱ्याच ठिकाणी झाला. पण, ज्या ठिकाणी गटारी असून त्या कधीही स्वच्छ न केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नव्हती. पाणी थेट रस्त्यावर आले हाेते. याशिवाय काही भागात गटारीच नसल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कारणामुळे पावसाच्या पाण्याचे मोठमोठे डबके रस्त्यावर जमा झाले हाेते. तसेच रस्त्यावर खड्डे असल्याने त्यात पुन्हा भर पडली होती. पाणी त्या खड्ड्यात साचले असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागली.

धुळे तालुक्यात अतिवृष्टी

पावसाची दिवसभर संततधार आणि मुसळधार आलेल्या पावसामुळे धुळे तालुुक्यात पावसाने ६५ मिमीची किमान सरासरी ओलांडली. त्यामुळे धुळे शहर, तालुक्यासह खेडे, सोनगीर आणि नेर मंडळात अतिवृष्टी झाल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. या ठिकाणी पिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरले हाेते. पिकांचेही नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यात एकाच दिवशी ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.