शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

दुष्काळात तेरावा, महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

दुष्काळात तेरावा, महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज उस्मानाबाद : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास आर्थिक हातभार लागावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ...

दुष्काळात तेरावा, महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज

उस्मानाबाद : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास आर्थिक हातभार लागावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील

जिल्ह्यातील १२ हजार ८२० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. हे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी पडताळणी करून देणे बंधनकारक आहे. मात्र, आजघडीला ७६९ अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळीविना पडून आहेत.

अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाच्यावतीने मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास ३ डिसेंबर २०२० पासून प्रारंभ झाला होता. शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्याभरातील १२ हजार ८२० विद्यार्थ्यांनी आजवर ऑनलाईन अर्ज केले आहेत. यापैकी एस.सी. प्रवर्गातील ६ हजार १४५ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत, तर ६ हजार ६७५ अर्ज व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केले. आलेले अर्ज महाविद्यालयांनी पडताळणी करून देणे बंधनकारक आहे. असे असतानाही सध्या महाविद्यालयांकडून अर्ज पडताळणी धिम्या गतीने सुरू आहे. ७६९ अर्ज पडताळणीविना पडून असून, ३१ जूनपर्यंत महाविद्यालयांना अर्जांची पडताळणी करावी लागणार आहे.

महाविद्यालयांशी पत्रव्यवहार

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची महाविद्यालय स्तरावरून पडताळणी केली जाते. काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहिले आहेत. ३० मार्चपासून सतत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करून सहकार्य करावे.

बाबासाहेब अरवत, सहायक आयुक्त समाजकल्याण

ऑनलाईन अर्ज सादर केले

एस.सी प्रवर्ग व्ही.जे.एन.टी

६१४५ ६६७५

समाजकल्याण विभागाने निकाली काढले

एस.सी व्ही.जे.एन.टी

५८४० ६२११

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित

एस.सी व्ही.जे.एन.टी

३०५ ४६४

अभिजित गायकवाड

बी. ए. पदवी अभ्यासक्रमास मी प्रवेश घेतला आहे. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र, आधार लिंक होत नसल्याने महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचा अर्ज प्रलंबित आहे. आधार लिंक होत शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे.

अभिजित गायकवाड, विद्यार्थी