शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

पेरणीलायक पाऊस नाही

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली.

तामलवाडी : मृग नक्षत्र संपले तरी तामलवाडी परिसरात अद्याप पेरणीलायक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच सोयाबीन व कांदा बियाणाचे भाव दुपटीने वाढले असून, सद्यस्थितीत शासनाकडून मिळणारे गारपिटीचे अनुदानच शेतकऱ्यांना खरिपातील पेरण्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे.७ जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु, अद्याप या भागात एकही दमदार पाऊस झाला नाही. यामुळे मशागतीची कामे करुन पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाचे वेळापत्रक बिघडत चालले आहे. त्यातच या हंगामात सोयाबीनच्या बियाणाची पिशवीचा भाव २६०० रुपये तर कांदा बियाणाच्या १ किलोचा भाव ३२०० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे बियाणे हे घरगुती वापरावे असा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. (वार्ताहर)बँक शाखेभोवती शेतकऱ्यांची गर्दीतामलवाडी येथील जिल्हा बँक शाखेभोवती सध्या अनुदान वाटपासाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे. तासन् तास रांगा लावल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांअभावी वाटप संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळविण्यासठी किमान दोन दिवस लागतात. आणखीन किती दिवस हे वाटपाचे सत्र सुरु राहणार हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे.टप्प्याटप्प्याने वाटपसांगवी (काटी), वडगाव (काटी), सुरतगाव, जळकोटवाडी, पांगरधरवाडी या गावचे गारपीट अनुदान वाटप टप्प्याटप्प्याने सुरु आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शासनाने मंजूर केलेले अनुदान बियाणे खरेदीसाठी आधार ठरत असून, खासगी सावकाराचे उंबरठे झिजविणे काहीसे बंद झाले आहे.