शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काटी कृषी मंडळात १८ हजार हेक्टरवर सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयाअंतर्गत २२ गावात खरीप हंगामातील २४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १८ हजार हेक्टर ...

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयाअंतर्गत २२ गावात खरीप हंगामातील २४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला असून, सध्या ही पिके जोमदार आहेत. पिकाच्या अंतर्गत मशागतीच्या कामात बळीराजा गुंतल्याचे दिसून येत आहे.

काटी मंडळात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला प्रारंभ केला. परंतु, काही शेतकऱ्यांच्या पेरण्या जमिनीतील ओल संपल्याने खोळंबल्या होत्या. या मंडळात १८ हजार क्षेत्रावर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला तर उर्वरित ६ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, मूग, तूर, मका आदी पिकाचा पेरा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

पेरणीनंतर पावसाने २० दिवसाचा खंड दिल्याने उगवलेली पिके माना टाकू लागली होती. मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. सध्या या मंडळात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाच्या अंतर्गत मशागतीची कामे सुरू झाली आहेत. कोळपणी, खुरपणी आदी कामात बळीराजा गुंतला आहे. खुरपणीला दिवसाकाठी २५० मजुरी महिला मजुरांना द्यावी लागत आहे. दुसरीकडे खते, बियाणाची देखील दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

चौकट

सोयाबीनचा उच्चांक

काटी मंडळातील जवळपास ८० टक्के क्षेत्रावर यंदा सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. ५ टक्के पेरणी पावसाअभावी थांबली होती. मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसानंतर तीही आता सुरू झाली आहे. बाजारात सोयाबीनचा भाव वाढल्याने यंदा शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आहे.

- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी

चौकट

पीक विम्याकडे फिरविली पाठ

गतवर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकाचे परतीच्या पावसाने ८० टक्के नुकसान झाले. परंतु, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे यंदा खरीप विमा भरण्यास शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. पीक विमा भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना पीक विम्याबाबत वातावरण सकारात्मक नसल्याचे पहावयास मिळत आहे.