शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पावसाची हुलकावणी, पेरणी १० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : निम्मा जून उलटून गेला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. परिणामी, पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला ...

उस्मानाबाद : निम्मा जून उलटून गेला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. परिणामी, पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला विलंब होत चालल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे कल वाढवला असून, जिल्ह्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस हा अनियमित होत असतो. शिवाय, कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरड अशी स्थिती नेहमीचीच आहे. याचा परिणाम पीक बदलात होत चालला आहे. उशिरा पेरणी झाली व कितीही नैसर्गिक संकटे आली तरी सोयाबीन हे किमान खर्च काढून देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात दरवर्षी नव्याने भर पडत आहे. दरम्यान, यावर्षीही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पेरणीसाठी सरासरी १०० मिमी पावसाची गरज आहे. मात्र, आतापर्यंत भूम व तुळजापूर वगळता ही सरासरी कोणत्याही तालुक्याने ओलांडली नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात लागवडीखाली येणारे क्षेत्र ५ लाख ३२ हजार ७३९ हेक्टर्स इतके आहे. यापैकी आजघडीला केवळ ५४ हजार १९५ हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाच्या विलंबामुळे उडीद, मूग या पिकांचा पेरा कमी होत चालला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ हजार ९१३ हेक्टर्सवर मूग तर ६ हजार ८९९ हेक्टर्सवर उडीदाचा पेरा झाला आहे. अपेक्षित पेरणीच्या तुलनेत हे क्षेत्र १४ टक्के आहे. कृषी विभागाने यावेळी २ लाख ४० हजार हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होईल, असे गृहित धरले आहे. त्या तुलनेत आजघडीला जिल्ह्यात ३६ हजार ६२९ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या शिवाय, प्रमुख पीक असलेल्या तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ८८ हजार ७५१ इतके अपेक्षित आहे. तुलनेत पेरणी ही केवळ ४ हजार ८०१ हेक्टर्सवर झाली आहे. पावसाने आणखी ताटकळत ठेवल्यास उडीद, मुगाच्या आशा मावळतील.

कळंब, तुळजापूर मध्ये सर्वाधिक पेरणी...

जिल्ह्यात पेरणीच्या बाबतीत कळंब व तुळजापूर तालुके आघाडीवर आहेत. कळंब तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २४० तर तुळजापूर तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. उस्मानाबाद ९२०, भूम ५ हजार ३०२, उमरगा ६९०, वाशी ८३१ तर लोहारा तालुक्यात ३ हजार ३०६ हेक्टर्सवर पेरणी झाली. परंड्यात अद्याप पेरण्या सुरु नाहीत.

पावसाची असमानता कायम...

जिल्ह्यात आतापर्यंत असमान पाऊस झाला आहे. भूम तालुक्यात सर्वाधिक १२४ मिमी तर त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात ११२ मिमी पावसाची नोंद आहे. उस्मानाबाद ६६, परंडा ५९, कळंब ९८, उमरगा ६५, लोहारा ८२ तर वाशी तालुक्यात ९३ मिमी पावसाची नोंद गुरुवारपर्यंत झाली आहे.