शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

बाजारपेठा सुसाट, फिजिकल डिस्टन्सिंगचा बाेजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने ७ जूनपासून निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंत ...

उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने ७ जूनपासून निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. नागरिक खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याने बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. एप्रिल महिन्यापासून बाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याने एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे तब्बल दोन महिने बाजारपेठ बंद होती. जून महिन्यात रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने ७ जूनपासून निर्बंध काहीअंशी शिथिल केले असून, दुपारी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, खाद्यदुकाने, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने, पावसाळ्यासंबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज दुपारी ४ पर्यंत सुरू राहत आहेत. बाजारपेठ उघडताच नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळते. बाजारपेठेत गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडतो. मात्र, अनेक नागरिक सध्या बाजारपेठेत मास्कचा वापर करताना आढळून येतात.

देशपांडे स्टॅन्ड भाजी मंडई

सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक शहरातील देशपांडे स्टॅन्ड परिसरातील भाजी मंडईत जात असतात. या ठिकाणी विक्रेते मास्क लावून तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. मात्र, ग्राहक फिजिकल डिस्टन्स न ठेवता मंडईत गर्दी करताना आढळून येतात.

बार्शी नाका भाजी मंडई

शहरातील बार्शी नाका परिसरातील रस्त्यालगत सकाळी भाजी व फळ विक्रेते भाजी विक्रीसाठी बसत असतात. या ठिकाणी शहरातील नागरिक भाजी खरेदीसाठी येतात. या ठिकाणीही ग्राहकांकडून नियमांचे पालन केले जाताना दिसत नाही.

बसस्थानकही गजबजले

७ जूनपासून शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून बसेस धावू लागल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची रेलचेल वाढली आहे. स्थानकात येणारे प्रवासी मास्कचा वापर करताना आढळून येतात. तसेच सॅनिटायझरचा वापरही केला जातो. मात्र, स्थानकात फिजिकल डिस्टन्सिंग राखले जात नाही.

दुकानदारांचे दुर्लक्ष

बाजारपेठेतील किराणा, कापड, भाजीपाला दुकानांसमोर ग्राहक गर्दी करीत असतात. दुकानासमोर गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. मात्र, अनेक ठिकाणी दुकानांसमोर गर्दी झालेली असतानाही दुकानचालक ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत सांगताना आढळून येत नाहीत. शिवाय, ग्राहकांनाही कोरोना विषाणूचे भय राहिले नसल्याचे दिसून येते.

विक्रेतेही बेफिकीर

मास्कविक्रीच्या स्टॉलवर कुणीही यावे, मास्क हाताळावा आणि पुढे जावे, अशी अवस्था बाजारपेठेत फिरल्यावर दिसून येते. मास्कला हात न लावण्याची सूचना देणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाबाबत बेफिकिरी असलेला विक्रेता देत नव्हता. त्यामुळे बेजबाबदार ग्राहकदेखील खुशाल मास्क हाताळत परत निघून जात होते.

रोज शेकडो नागरिकांवर कारवाया

कोविड-१९ संसर्गास आळा बसावा, यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या शेकडो नागरिकांवर पोलिसांकडून कारवाया करून २० ते २५ हजारांचा दंड वसूल केला जात आहे. असे असतानाही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.