शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरतेचा अभाव

By admin | Updated: March 23, 2016 01:06 IST

उस्मानाबाद : पाणी टंचाईने जिल्हा होरपळून निघत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असतानाही नागरिकांमध्ये

उस्मानाबाद : पाणी टंचाईने जिल्हा होरपळून निघत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असतानाही नागरिकांमध्ये अद्यापही जलसाक्षरतेचा अभाव असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. टंचाई काळातही ४८ टक्के नागरिकांनी आपण तसेच आपल्या कुटुंबियांकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याची कबुली दिली आहे.उस्मानाबाद शहरातील अनेक भागात सात दिवसआड तर काही परिसरात दहा दिवसआड पाणी पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती यंदाच्याच उन्हाळ्यातील नाही तर मागील अनेक वर्षापासून उस्मानाबादकर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. केवळ उस्मानाबादपुरताच हा विषय मर्यादित नाही तर उमरगा, कळंब, परंडा आदी जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वाड्या-वस्त्या तहानेने होरपळून निघत आहेत. उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस घालविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी या कामी नागरिकांचाही पुढाकार महत्वाचा आहे. मात्र नेमके याच ठिकाणी अनेकजण कमी पडत असल्याचे चित्र दिसून येते. जलसाक्षरतेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने प्रश्नावलीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची मते जाणून घेतली. तसेच जलसाक्षरतेबाबत नागरिक किती सजग आहेत याचा आढावा घेतला असता, जलसाक्षरतेसंदर्भात अधिक जनजागरणाची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. आपण तसेच आपल्या कुुटुंबियांकडून टंचाई काळातही पाण्याचा अपव्यय केला जातो, असे आपणास वाटते का? असा थेट प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे यावर तब्बल ४८ टक्के नागरिकांनी होय पाण्याचा अपव्यय होतो, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. तर काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो असे सांगणाऱ्या नागरिकांची संख्या २५ टक्के असून, २७ टक्के नागरिकांनी मात्र आमच्याकडून पाण्याचा जपून वापर केला जातो असे नमूद केले आहे. याच नागरिकांना ‘लोकमत’ने घर तसेच परिसरातील नळांना तोट्या बसविलेल्या आहेत काय? याची खातरजमा करता काय असा प्रश्न विचारला होता. यावरही ५८ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले. तर होय खातरजमा करतो असे म्हणणाऱ्या नागरिकांची संख्या २१ टक्के असून, तेवढ्याच म्हणजे २१ टक्के नागरिकांनी कधी-कधी आम्ही नळांना तोट्या आहेत का हे तपासतो, असे सर्व्हेक्षणावेळी स्पष्ट केले.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात होणाऱ्या पाणी उपशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच शेतीसाठी पाणीवापर करताना तूषार अथवा ठिबक प्रणाली बंधनकारक करायला हवी असा विचार मागील काही वर्षापासून विविध स्तरावर चर्चिला जात आहे. या अनुषंगाने नागरिकांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावर तब्बल ७३ टक्के नागरिकांनी होय शेतीसाठी तूषार अथवा ठिबक प्रणाली बंधनकारक करायला हवी असे म्हटले आहे. तर २७ टक्के नागरिक मात्र ही प्रणाली बंधनकारक करण्याविरोधात असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)