शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नकारात्मक निकाल दिल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. १९५८ पर्यंत मराठा समाजाला कुणबी ...

उस्मानाबाद : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नकारात्मक निकाल दिल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. १९५८ पर्यंत मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण होते. ते आरक्षण १९५८ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने मंडल आयोगाची निर्मिती करून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाज वगळण्यात आला. त्यामुळे शासनाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे, मराठा समाजाला घटनेच्या अधीन राहून १९५८ पर्यंत कुणबी मराठा (शेती करणारा) म्हणून obc प्रवर्गात आरक्षण होते. १९५८ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ओबीसी प्रवर्गवारी करण्यासाठी मंडळ आयोगाची निर्मिती केली. या आयोगाने कुठलीही सहानिशा न करता ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला वगळले तेव्हापासून आजपर्यंत समाज शैक्षणिक व नोकरीत आरक्षणापासून वंचित राहिला आहे.

मराठा समाजाला कुणबी मराठा जातप्रमाणपत्र मिळणे बंद झाले तसेच महाराष्ट्र शासनाने २०१६ मध्ये दिलेले एस.ई.बी.सी. चे १३ टक्के आरक्षण सुप्रिम कोर्टाने रद्द केले. घटना मान्य आरक्षण मराठा समाजाला मिळवायचे असेल ओबीसी प्रवर्गाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे ही मागणी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र साळुंके, जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, कालिदास गायकवाड, व्यंकटेश नागटिळक, बालाजी जावळे, ज्योतिराम काळे आदी उपस्थित होते.