शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

एमआरईजीएस अंतर्गत केवळ तुती लागवडीच्या कामांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

भूम : तालुक्यात तुती लागवडीची कामे वगळता एमआरईजीएस अंतर्गत एकही काम तालुक्यात सुरू नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

भूम : तालुक्यात तुती लागवडीची कामे वगळता एमआरईजीएस अंतर्गत एकही काम तालुक्यात सुरू नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामे सुरू करण्याबाबत प्रशासनच उदासीन असल्याचा आरोप मजुरांमधून होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक मंदीचे सावट असल्याने किमान कोरोनाचे नियम पाळत रोहयो अंतर्गत कामे सुरू करा, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात सध्या विविध ठिकाणी ५५ तुती लागवडीची कामे सुुरू असून, त्या कामांवर २८५ मजूर आहेत. गत दोन वर्षांपासून कामे नसल्याने मजुरांची मोठी अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत मातीनाला बांध, बांध बंदिस्ती, फळबाग लागवड, पडिक जमिनीवर वृक्ष लागवड, रस्त्याची नवीन कामे सुरू करण्याची गरज मजुरांमधून व्यक्त केली जात आहे. तालुक्यात ४० रस्ते अतिक्रमणमुक्त झाले असून, या रस्त्यावर माती कामे झाली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावर खडीकरणाची कामे सुरू केली तरच जिल्हाधिकारी यांनी राबविलेल्या मोहिमेचा उपयोग होणार असून, या माध्यमातून मजुरांना कामेदेखील उपलब्ध होऊ शकतील, असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

तालुक्यात नोंदणीकृत २२ ते २५ हजारांच्या जवळपास मजूर आहेत. पंरतु, सद्यस्थितीत केवळ तुती लागवडीची ५५ कामे वगळता एकही काम नसल्याने कोरोना काळात मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असून, पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीचीदेखील कामे सुरू होऊ शकतील, असे काही मजुरांचे म्हणणे आहे.

कोट.........

सध्या मजुरांची कामाची मागणी नाही. परंतु, कुणी मागणी केली तरी पंचायत समिती स्तरावर व इतर यंत्रणेकडून सुरू असलेल्या कामांकडे ही मागणी वर्ग करून त्यांना कामे उपलब्ध करून देता येऊ शकतील.

-उषाकिरण श्रृंगारे, तहसीलदार, भूम

गेल्या दोन वर्षांपासून महसूल प्रशासनाकडून एमआरईजीएसची कामे सुरू नाहीत. तुती लागवड सोडून इतर कामे सुरू करावीत, अशी मजुरांची मागणी आहे. कोरोनाचे नियम पाळून कामे सुरू केली तर मजुरांची उपासमार थांबेल.

- राजकुमार घरत, आष्टा, ता. भूम

चौकट

पं.स.च्या कामावर ५६३ मजूर उपस्थिती

पंचायत समिती यंत्रणामार्फत मोठ्या प्रमाणात कामे सुरु करण्याची गरज आहे. परंतु, येथेही थोड्या फार प्रमाणात कामे सुरु आसल्याने मजुराची उपासमार सुरू आहे. सार्वजनिक विहिरींची दोन व रस्त्यांची केवळ तीन कामे सुरू असून, वैयक्तिक लाभाच्या कामात घरकुलाची २८, गोठ्याची २६ आणि सिंचन विहिरींची २६ कामे करण्यात येत आहेत. यावर ५६३ मजूर काम करीत आहेत.