शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 21:47 IST

इस्राईल दुतावास, महाराष्ट्र सायबरचे चर्चासत्र

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ  थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा शिरकाव होणार आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे या विश्वात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहावे. सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षादूत (अँम्बेसेडर) व्हावे, असे आवाहन सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांनी केले.सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा विद्यार्थ्यांनी सुरक्षितरित्या वापर कसा करावा, याची माहिती देण्यासाठी व सायबर गुन्ह्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील इस्राईल दूतावास, नेहरू विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू विज्ञान केंद्रात झालेल्या या कार्यशाळेत मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.इस्त्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत याकोव फिन्कलस्टन, उपवाणिज्यदूत निमरोड कलमार आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया, 'रिस्पॉन्सिबल नेटीझन' स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली पाटणकर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मनोज प्रभाकरन यांनी चर्चासत्रात भाग घेतला.या कार्यक्रमात इस्राईलमधील सायबर सुरक्षा तज्ञ मेन्नी ब्राझिले यांनी स्काईपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सायबर विश्वातील घडामोडी व सायबर सुरक्षेसंदर्भात संवाद साधला. स्मार्ट फोन, इंटरनेट आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरताना असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देत त्यांनी ऑनलाईन जगात स्वत:चे संरक्षण कसे करावे हे विविध पद्धती सांगून स्पष्ट केले.महाराष्ट्र सायबरचे अधीक्षक सचिन पांडकर यांनी विविध सायबर सुरक्षा विषयक उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, सायबर गुन्ह्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबर कडक पावले उचलत आहे. महिला व मुलांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध आता थेट संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे. तसेच फिशिंगच्या घटना टाळण्यासाठीही अँटि फिशिंग संकेतस्थळावर तक्रार केल्यास तातडीने दखल घेतली जाते. सायबर सुरक्षा तज्ञ आणि अन्वेषक रितेश भाटिया आणि सायबर सुरक्षा आणि जनजागृती साठी सुरु केलेल्या 'रिस्पॉन्सिबल नेटीझन' या उपक्रमाच्या संस्थापक सोनाली पाटणकर यांनीही विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करता काय काळजी घ्यावी, याबद्दल माहिती दिली.महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘इस्राईलचे मुंबईतील दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी नक्कीच तंत्रज्ञानाचा वापर अधिक जागरूकतेने आणि आत्मविश्वासाने इंटरनेटचा वापर करतील.’ पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत म्हणाले, ‘या कार्यक्रमाद्वारे आपण भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी तरुण पिढीला सक्षम करत आहोत. तरुणांमध्ये तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर कसा करावा याबद्दल जनजागृती होईल ज्याद्वारे घडणाºया आॅनलाईन गुन्ह्यांना आळा घालता येईल.’

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबई