शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

माजी गृहमंत्र्याचा बंगला फोडणारा चोरटा अटकेत; घरफोडीचे ठोकले आहे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 19:38 IST

आरोपी सय्यद सिकंदरने १० वर्षांपूर्वी फोडला होता माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांचा बंगला

ठळक मुद्दे४०० ग्रॅम सोने जप्त १३ लाखांची रोकड गोठविली 

औरंगाबाद : सिडको एन-४ मधील निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. नामदेव कलवले यांचा बंगला फोडून सुवर्णालंकार आणि रोकड पळविल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी दोन चोरट्यांसह सोने खरेदी करणाऱ्या दुकानदाराला अटक केली. या आरोपींकडून ४०० ग्रॅम सोन्याची लगड आणि कार जप्त केली असून, आरोपीने पत्नीच्या नावे बँकेत ठेवलेली १३ लाखांची रोकड गोठविल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही चोरी करणाऱ्या सय्यद सिकंदरला १० वर्षांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्यातून सोन्याचे दागिने पळविल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती.

पोलीस आयुक्त म्हणाले की, डॉ. कलवले कुटुंबासह मुंबईला गेले असता त्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. ७७ तोळ्याचे दागिने आणि पावणेपाच लाख रुपये रोख चोरीला गेल्याचा गुन्हा पुंडलिकनगर ठाण्यात ३० डिसेंबर रोजी दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, निखिल खराडकर, प्रवीण मुळे, नंदा गरड यांच्या पथकाने तपास करून खिडकी गँगचा म्होरक्या संशयित आरोपी सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३६, रा. बीड, ह.मु. चेतना कॉलनी, अहमदनगर) याला अटक केली.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शंकर जाधव याच्या मदतीने बंगल्याची रेकी करून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शंकर जाधवला अटक केली. जालना येथील सोन्या-चांदीचा दुकानदार अनिल शालीग्राम शेळके याला चोरीचे दागिने विक्री केल्याचे चौकशीत त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपी अनिलकडे चौकशी केली असता त्याने दागिने खरेदी केल्याची कबुली देत  ते दागिने वितळविल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ४०० ग्रॅमची सोन्याची लगड जप्त केली, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी टॉमी, मोबाईलही जप्त केला.

आरोपी सिकंदरने गुन्ह्याचे ठोकले अर्धशतकआरोपी सिकंदर साथीदारांच्या मदतीने आंतरजिल्हा खिडकी गँग चालवितो. उच्चभ्रू वसाहतीमधील बंगल्यांच्या खिडक्या काढून चोऱ्या करण्याची या टोळीची पद्धत आहे. या टोळीने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून १० वर्षांपूर्वी चोरी केली होती. अहमदनगर, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड आदी ठिकाणी त्याच्याविरोधात ५० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. खाडे यांनी दिली. आरोपी सिकंदर वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या महिलांसोबत राहतो. त्याची एक पत्नी औरंगाबादेतील पिसादेवी परिसरात राहते. शिवाय त्याने बीड आणि अहमदनगर येथे एका महिलेसोबत घरोबा केल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदनगर येथील एका मैत्रिणीच्या माध्यमातून पोलिसांनी सिकंदरला पकडले. तर पत्नीला अटक करतो, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्याने तोंड उघडले.

सिकंदरच्या मैत्रिणीचे खाते सीलआरोपी सिकंदरने मैत्रीण रेश्माच्या बँक खात्यात १५ लाख ३९ हजार रुपये १ आणि २ जानेवारी रोजी जालना येथील खाजगी मनी ट्रान्स्फर एजन्सीमधून जमा केले होते. यापैकी पावणेचार लाख रुपये काही दिवसांत खात्यातून काढले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी बँकेला पत्र देऊन बँक खात्यातील रक्कम गोठविली.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकAurangabadऔरंगाबाद