शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

माजी गृहमंत्र्याचा बंगला फोडणारा चोरटा अटकेत; घरफोडीचे ठोकले आहे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 19:38 IST

आरोपी सय्यद सिकंदरने १० वर्षांपूर्वी फोडला होता माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांचा बंगला

ठळक मुद्दे४०० ग्रॅम सोने जप्त १३ लाखांची रोकड गोठविली 

औरंगाबाद : सिडको एन-४ मधील निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. नामदेव कलवले यांचा बंगला फोडून सुवर्णालंकार आणि रोकड पळविल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी दोन चोरट्यांसह सोने खरेदी करणाऱ्या दुकानदाराला अटक केली. या आरोपींकडून ४०० ग्रॅम सोन्याची लगड आणि कार जप्त केली असून, आरोपीने पत्नीच्या नावे बँकेत ठेवलेली १३ लाखांची रोकड गोठविल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही चोरी करणाऱ्या सय्यद सिकंदरला १० वर्षांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्यातून सोन्याचे दागिने पळविल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती.

पोलीस आयुक्त म्हणाले की, डॉ. कलवले कुटुंबासह मुंबईला गेले असता त्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. ७७ तोळ्याचे दागिने आणि पावणेपाच लाख रुपये रोख चोरीला गेल्याचा गुन्हा पुंडलिकनगर ठाण्यात ३० डिसेंबर रोजी दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, निखिल खराडकर, प्रवीण मुळे, नंदा गरड यांच्या पथकाने तपास करून खिडकी गँगचा म्होरक्या संशयित आरोपी सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३६, रा. बीड, ह.मु. चेतना कॉलनी, अहमदनगर) याला अटक केली.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शंकर जाधव याच्या मदतीने बंगल्याची रेकी करून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शंकर जाधवला अटक केली. जालना येथील सोन्या-चांदीचा दुकानदार अनिल शालीग्राम शेळके याला चोरीचे दागिने विक्री केल्याचे चौकशीत त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपी अनिलकडे चौकशी केली असता त्याने दागिने खरेदी केल्याची कबुली देत  ते दागिने वितळविल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ४०० ग्रॅमची सोन्याची लगड जप्त केली, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी टॉमी, मोबाईलही जप्त केला.

आरोपी सिकंदरने गुन्ह्याचे ठोकले अर्धशतकआरोपी सिकंदर साथीदारांच्या मदतीने आंतरजिल्हा खिडकी गँग चालवितो. उच्चभ्रू वसाहतीमधील बंगल्यांच्या खिडक्या काढून चोऱ्या करण्याची या टोळीची पद्धत आहे. या टोळीने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून १० वर्षांपूर्वी चोरी केली होती. अहमदनगर, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड आदी ठिकाणी त्याच्याविरोधात ५० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. खाडे यांनी दिली. आरोपी सिकंदर वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या महिलांसोबत राहतो. त्याची एक पत्नी औरंगाबादेतील पिसादेवी परिसरात राहते. शिवाय त्याने बीड आणि अहमदनगर येथे एका महिलेसोबत घरोबा केल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदनगर येथील एका मैत्रिणीच्या माध्यमातून पोलिसांनी सिकंदरला पकडले. तर पत्नीला अटक करतो, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्याने तोंड उघडले.

सिकंदरच्या मैत्रिणीचे खाते सीलआरोपी सिकंदरने मैत्रीण रेश्माच्या बँक खात्यात १५ लाख ३९ हजार रुपये १ आणि २ जानेवारी रोजी जालना येथील खाजगी मनी ट्रान्स्फर एजन्सीमधून जमा केले होते. यापैकी पावणेचार लाख रुपये काही दिवसांत खात्यातून काढले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी बँकेला पत्र देऊन बँक खात्यातील रक्कम गोठविली.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकAurangabadऔरंगाबाद