शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

कृषी वैज्ञानिकांनी केले सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:30 IST

‘महाराष्ट्रात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा येथील कृषी वैज्ञानिकांनी जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला. त्यामुळे भूगर्भातील ७२ टक्के पाणी स्रोत सुकून गेले आहेत. आधुनिक धरणीचे पोट रिकामे करण्याचे काम या वैज्ञानिकांनी केले, अशी घणाघाती टीका रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. वाल्मी येथे बुधवारी (दि.७) पार पडलेल्या राज्यस्तरीय जलसाक्षरता उजळणी प्रशिक्षण वर्गामध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देराजेंद्र सिंह : भूगर्भातून वारेमाप पाणी उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘महाराष्ट्रात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा येथील कृषी वैज्ञानिकांनी जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला. त्यामुळे भूगर्भातील ७२ टक्के पाणी स्रोत सुकून गेले आहेत. आधुनिक धरणीचे पोट रिकामे करण्याचे काम या वैज्ञानिकांनी केले, अशी घणाघाती टीका रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. वाल्मी येथे बुधवारी (दि.७) पार पडलेल्या राज्यस्तरीय जलसाक्षरता उजळणी प्रशिक्षण वर्गामध्ये ते बोलत होते.जल व भूमिव्यवस्थापन संस्था (वाल्मी), मराठवाडा विभागीय जलसाक्षरता केंद्र आणि यशदातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, आ. अतुल सावे, एस.डी. हजारे आदी मंचावर उपस्थित होते.पीकपेºयाची मान्सून चक्राशी सांगड घालून जमिनीत पाणी जिरवण्यावर भर देण्यात यावा, असा सल्ला देताना डॉ. सिंह यांनी भूगर्भातील जलाशय वाढले नाहीत, तर मराठवाड्याचा राजस्थान होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंतादेखील व्यक्त केली. जलसाक्षरता वाढविण्यासाठी गावागावांत नियमित ग्रामसभा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.शासनाने जलसाक्षरता जलजागृतीचा उपक्रम लोकसहभागातून स्वयंसेवकांद्वारे राबविण्याचा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत जलनायक, जलयोद्धे, जलप्रेमी, जलकर्मी आणि जलसेवक, अशी ‘फाईव्ह स्टार’ फळी निर्माण करण्यात येणार आहे. एकूण ७२ जणांची यामध्ये नियुक्ती करण्यात येणार असून, उपक्रमाच्या भविष्यकालीन रूपरेषेवर मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. रूपाली गोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. एम.बी. धादवड यांनी आभार मानले.कृषी विभागावर ताशेरेकृषी विभागाच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, पाण्याची उपलब्धता आणि पिकाला लागणारे पाणी याचा कधी शेतकºयांनी विचारच केला नाही. त्यामुळे जलव्यवस्थापन कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कृषी सहायक शेतकºयांना शेतीव्यवस्थापन करण्यात मदत करीत नाही. शेतकºयांशी संवाद साधून पाणी व पिकाचे चक्र जुळविण्याचे काम होत नाही. त्यामुळे जलसाक्षरतेच्या कार्यात स्वयंसेवकांची मदत घ्यावी लागते.