शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी वैज्ञानिकांनी केले सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:30 IST

‘महाराष्ट्रात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा येथील कृषी वैज्ञानिकांनी जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला. त्यामुळे भूगर्भातील ७२ टक्के पाणी स्रोत सुकून गेले आहेत. आधुनिक धरणीचे पोट रिकामे करण्याचे काम या वैज्ञानिकांनी केले, अशी घणाघाती टीका रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. वाल्मी येथे बुधवारी (दि.७) पार पडलेल्या राज्यस्तरीय जलसाक्षरता उजळणी प्रशिक्षण वर्गामध्ये ते बोलत होते.

ठळक मुद्देराजेंद्र सिंह : भूगर्भातून वारेमाप पाणी उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘महाराष्ट्रात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा येथील कृषी वैज्ञानिकांनी जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला. त्यामुळे भूगर्भातील ७२ टक्के पाणी स्रोत सुकून गेले आहेत. आधुनिक धरणीचे पोट रिकामे करण्याचे काम या वैज्ञानिकांनी केले, अशी घणाघाती टीका रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. वाल्मी येथे बुधवारी (दि.७) पार पडलेल्या राज्यस्तरीय जलसाक्षरता उजळणी प्रशिक्षण वर्गामध्ये ते बोलत होते.जल व भूमिव्यवस्थापन संस्था (वाल्मी), मराठवाडा विभागीय जलसाक्षरता केंद्र आणि यशदातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, आ. अतुल सावे, एस.डी. हजारे आदी मंचावर उपस्थित होते.पीकपेºयाची मान्सून चक्राशी सांगड घालून जमिनीत पाणी जिरवण्यावर भर देण्यात यावा, असा सल्ला देताना डॉ. सिंह यांनी भूगर्भातील जलाशय वाढले नाहीत, तर मराठवाड्याचा राजस्थान होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंतादेखील व्यक्त केली. जलसाक्षरता वाढविण्यासाठी गावागावांत नियमित ग्रामसभा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.शासनाने जलसाक्षरता जलजागृतीचा उपक्रम लोकसहभागातून स्वयंसेवकांद्वारे राबविण्याचा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत जलनायक, जलयोद्धे, जलप्रेमी, जलकर्मी आणि जलसेवक, अशी ‘फाईव्ह स्टार’ फळी निर्माण करण्यात येणार आहे. एकूण ७२ जणांची यामध्ये नियुक्ती करण्यात येणार असून, उपक्रमाच्या भविष्यकालीन रूपरेषेवर मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. रूपाली गोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. एम.बी. धादवड यांनी आभार मानले.कृषी विभागावर ताशेरेकृषी विभागाच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, पाण्याची उपलब्धता आणि पिकाला लागणारे पाणी याचा कधी शेतकºयांनी विचारच केला नाही. त्यामुळे जलव्यवस्थापन कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कृषी सहायक शेतकºयांना शेतीव्यवस्थापन करण्यात मदत करीत नाही. शेतकºयांशी संवाद साधून पाणी व पिकाचे चक्र जुळविण्याचे काम होत नाही. त्यामुळे जलसाक्षरतेच्या कार्यात स्वयंसेवकांची मदत घ्यावी लागते.