शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

२५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे काम रखडले

By admin | Updated: June 9, 2014 00:12 IST

जालना: पावसाळा तोंडावर असताना जिल्ह्यातील २५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे.

जालना: पावसाळा तोंडावर असताना जिल्ह्यातील २५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. त्यासाठीचा ६ कोटींचा निधी पडून असून विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोठे बसविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात एकूण अंगणवाड्यांची संख्या १९५४ आहे. २०१०-११ पासून जिल्ह्यातील अंगणवाड्यांना इमारत बांधकाम करण्यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत आहे. आतापर्यंत बहुतांश अंगणवाड्यांच्या इमारतींचे काम झालेले असून केवळ २५७ अंगणवाड्यांचे काम शिल्लक आहे. सन २०१३-१४ अंतर्गत या अंगणवाड्यांसाठी ११ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र पूर्वी एका अंगणवाडीच्या इमारतीसाठी शासनाकडून साडेचार लाख रुपयांचा निधी दिला जात होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून शासनाच्या सुधारित निर्णयानुसार एका अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी सहा लाखांचा निधी मंजूर केलेला आहे. जिल्हा परिषदअंतर्गत ५ लाखांपेक्षा अधिक खर्चाची कामे ई-टेंडरींगद्वारे केली जातात. परंतु ज्या अंगणवाड्यांसाठी सहा लाखांचा निधी मंजूर झाला, त्यापैकी काही ग्रामपंचायतींनी ई-टेंडरींग प्रक्रियेस अनास्था दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. तर ज्या अंगणवाड्यांसाठी साडेचार लाखांचा निधी मंजूर आहे, त्या ग्रामपंचायतींनी सहा लाखांचा निधी देण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाची भूमिका शासन निर्णयानुसार ठाम असल्याने इमारतींचे बांधकाम करण्यास काही ग्रामपंचायतींकडूनच तयारी होत नसल्याचे दिसून येते. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असून ग्रामपंचायतींनी आपली मागणीही रेटून धरल्याचे समजते. त्यामुळे इमारतींच्या बांधकामासाठीचा निधी मात्र पडून आहे.मे महिन्यात झालेल्या जि.प. स्थायी समितीच्या सभेत काही सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला. प्रशासनाच्या संथ कार्यवाहीमुळेच हा निधी पडून असल्याचा आरोपही सदस्यांनी केला होता. पावसाळा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम लवकर व्हावे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कामांसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया वगळण्याचा सूरग्रामपंचायत पातळीवरून या अंगणवाड्यांचे बांधकाम होत असल्याने पूर्वी साडेचार लाखांचे अनुदान असताना ई-टेंडरींग प्रक्रिया नव्हती. आता सहा लाखांचे अनुदान एका अंगणवाडी इमारतीसाठी मंजूर झाल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे ई-टेंडरींग प्रक्रिया आवश्यक आहे. ती वगळावी, असा सूर काही ग्रामपंचायतींकडून लावला जात आहे.ग्रा.पं.कडून सहकार्याची अपेक्षा - गव्हाडयाबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शीतल गव्हाड म्हणाल्या, जिल्ह्यात केवळ २५७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे काम शिल्लक असून पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन इमारतींचे बांधकाम करून घेणे गरजेचे आहे. प्रशासकीय पातळीवर आपलाही पाठपुरावा सुरू असून सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा सभापती गव्हाड यांनी व्यक्त केली आहे.