शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

कोणाची होणार सरशी; लक्ष निकालाकडे

By admin | Updated: May 16, 2014 00:38 IST

औरंगाबाद : तब्बल २१ दिवसांपासून मतदान यंत्रात कुलूपबंद उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित होणार आहे.

औरंगाबाद : तब्बल २१ दिवसांपासून मतदान यंत्रात कुलूपबंद उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित होणार आहे. अटीतटीच्या झालेल्या लढतीत कोणाची सरशी होणार? आघाडी की महायुती, कोण बाजी मारणार यावर शहरात गरमागरम चर्चा झडू लागल्या आहेत. औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघासाठी दि. २४ एप्रिल रोजी मतदान झाले होते. तत्पूर्वी जोरदार प्रचाराने अवघा मतदारसंघ ढवळून निघाला होता. औरंगाबाद व जालना मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केल्यानंतर चौथ्यांदा शड्डू ठोकून मैदानात उतरलेले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे चंद्रकांत खैरे व रावसाहेब दानवे यांनी प्रचारात मारलेल्या मुसंडीला काँग्रेस आघाडीचे औरंगाबादचे तरुण उमेदवार नितीन पाटील व जालन्याचे विलास औताडे यांनी दिलेली जोरदार टक्कर चर्चेची ठरली होती. आपचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष लोमटे व जालन्याचे दिलीप म्हस्के यांच्या प्रवेशाने ही लढत अधिकच लक्षणीय झाली होती. औरंगाबादेत कोणता ‘फॅक्टर’ चालला? मोदी लाटेवर आरूढ झालेले चंद्रकांत खैरे हे तरणार की दलित, मुस्लिम, मराठा मतांवर भिस्त असलेले नितीन पाटील जिंकणार, आम आदमीचे सुभाष लोमटे, समाजवादीचे अ‍ॅड. सदाशिव गायके यांनी किती मते आपल्याकडे खेचली, यावर या लढतीचा निकाल अवलंबून राहणार आहे. मोदी लाट की मुस्लिम, मराठा, दलित फॅक्टर चालला, यावर पैजा लागत आहेत. सुभाष लोमटे यांनी मुस्लिम व हिंदूंची मतेही काही प्रमाणात आकर्षित केली होती. त्यामुळे त्यांनी अधिक मते घेतल्यास ते कोणाला धोकादायक ठरतील, आदी अनेक आडाखे विविध पक्षांचे कार्यकर्ते, राजकीय जाणकार व नागरिक लावत होते. काही अपक्ष उमेदवारांनी प्रचारात चांगलेच रंग भरले होते. औरंगाबादेत या प्रमुख उमेदवारांसह तब्बल २७ उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे नितीन पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे अब्दुल खुद्दूस, आंबेडकर नॅशनल काँग्रेसच्या पुष्पा जाधव, प्रबुद्ध रिपब्लिकनचे मन्नालाल बन्सवाल, समाजवादीचे अ‍ॅड. सदाशिव गायके, वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियाचे सय्यद शफियोद्दीन, आम आदमीचे सुभाष लोमटे आणि अपक्ष अब्दुल अजीज, उद्धव बनसोडे, अंकुश तुपसंमुद्रे, कैलास ठेंगडे, जगदीप शिंदे, मधुकर त्रिभुवन, नानासाहेब दांडगे, नदिम राणा, सुरेश फुलारे, डॉ. फेरोज खान, बाळासाहेब सराटे, बाळासाहेब आवारे, जवाहरलाल भगुरे, भानुदास सरोदे, जालन्यात काय होणार? जालना लोकसभा मतदार संघात प्रमुख लढत महायुतीचे रावसाहेब दानवे व काँग्रेस आघाडीचे विलास औताडे यांच्यातच होणार असली तरी आपचे दिलीप म्हस्के हे किती मतविभाजन घडवून आणतात व कुणाला लाभदायक आणि कुणाला धोकादायक ठरतात, यावर निकालाची होडी हेलकावे खाणार आहे. ‘चकवा आणि उपरा’ ही दोन विशेषणे जालन्यात निवडणुकीच्या काळात चांगलीच प्रसिद्धीस पावली होती. जालन्यातून तब्बल २२ उमेदवारांनी आपले भवितव्य अजमावले आहे. निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, उद्या शुक्रवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण २१ फेर्‍या होणार असून, प्रत्येक फेरीला दहा मिनिटांचा अवधी लागणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडून दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यावेळी मतमोजणी केंद्र शहराबाहेर शेंद्रा एमआयडीसी परिसरात ठेवले आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा आणि निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्यांदा पोस्टल मतदान मोजले जाईल. त्यानंतर ८.३० वाजता मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतदानाची मोजणी सुरू होईल. मोजणी केंद्रावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. सहा विधानसभा क्षेत्राच्या एकूण ८४ टेबलवर एकाच वेळी ही मतमोजणी होईल. पहिल्या फेरीसाठी अर्धा तास लागणार असून, त्यापुढील प्रत्येक फेरीसाठी केवळ दहा मिनिटांचा वेळ लागणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व २१ फेर्‍या पूर्ण होऊन अंतिम निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. ८४ टेबलवर होणार मोजणी पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ९ वाजता लागणार दुसर्‍या फेरीपासून प्रत्येक फेरीसाठी दहा मिनिटे मोजणी केंद्राजवळ पाचशे पोलिसांचा फौजफाटा दोन किलोमीटर अलीकडेच प्रवेशबंदी केबल नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी मतमोजणी केंद्रावर उमेदवार, मोजणी प्रतिनिधींनाच प्रवेश मतमोजणी केंद्रात मोजक्याच व्यक्तींना प्रवेश असणार आहे. उमेदवार, त्यांचे मोजणी प्रतिनिधी आणि पत्रकार एवढ्या व्यक्तींनाच आत जाता येणार आहे. इतर व्यक्तींना मतदान केंद्रापासून दूर ठेवले जाणार आहे. त्यासाठी बॅरिकेडस् टाकण्यात आले आहेत. मोजणी केंद्रात प्रत्येकाची झडती घेऊनच आत सोडले जाणार आहे. मोबाईल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आत नेण्यास मनाई करण्यात आली आहे.