शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

कृत्रीम पावसाचे विमान गेले कुणीकडे?

By admin | Updated: August 22, 2015 23:57 IST

उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु करण्यात आला होता. मात्र मागील १५ दिवसांपासून हे विमान दुष्काळी

उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु करण्यात आला होता. मात्र मागील १५ दिवसांपासून हे विमान दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्याकडे फिरकलेले नसल्याने कृत्रीम पावसाचे विमान गेले कुणीकडे असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबादसह तुळजापूर, भूम आणि परंडा तालुक्यातील काही भागात ५ आॅगस्ट रोजी कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र विमानाद्वारे ढगावर रासायनिक फवारणी करुनही दाट ढग नसल्याने या पहिल्या प्रयत्नाला फारसे यश मिळाले नव्हते. त्याचवेळी पुढील दोन महिने मराठवाड्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र पहिला प्रयत्न करुन १५ दिवस उलटले तरी कृत्रीम पावसाचे विमान जिल्ह्याकडे फिरकलेले नसल्याने हा प्रयोग सुरु आहे की नाही? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परंडा तालुक्यातील काही भागात विमान फिरल्याची चर्चा होती. हा प्रयत्न वगळता मागील पंधरा दिवसात विमानाने उस्मानाबाद जिल्ह्याला दर्शन दिलेले नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाही कृत्रीम पावसाचा हा प्रयोग का थांबविण्यात आला. अशी विचारणा आता नागरिकांतून होत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कुठल्याही भागात फारसा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कृत्रीम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी होत आहे.