शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

घोटाळेबहाद्दरांविरुद्ध कधी आवळणार फास?

By admin | Updated: June 13, 2014 00:33 IST

दिनेश गुळवे , बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेत कित्तेक घोटाळ्यांची प्रकरणे केवळ चौकशी फेऱ्यात अडकलेले आहेत. कित्तेक प्रकरणात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.

दिनेश गुळवे , बीडजिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेत कित्तेक घोटाळ्यांची प्रकरणे केवळ चौकशी फेऱ्यात अडकलेले आहेत. कित्तेक प्रकरणात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहेत असे अधिकारी, कर्मचारी आजही बॅँकेत उजळ माथ्याने ‘काम’ करीत आहेत. काही प्रकरणांना तर वरिष्ठांनीच ‘स्टे’ दिला आहे. बॅँकेत शेतमजूर, वृद्ध, महिला यांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. असे असतानाही बॅँक ‘दोषींना’ कुठवर पाठीशी घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बॅँकेचे तत्कालीन प्रशासक टाकसाळे यांच्यावर जलद झालेल्या कारवाईने इतरांचा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. बॅँकेत अनेक गैरप्रकार झालेले आहेत. त्यावर विभागीय निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांनी वांरंवार ठपका ठेवलेला आहे. काही प्रकरणांना तर वरिष्ठ पातळीवरून स्टे देण्यात आला आहे. असे असताना टाकसाळे यांचे प्रकरण ‘जलद’ गतीने हाताळून त्याला ‘अंजाम’ कसा देण्यात आला. यावरून सध्या जिल्हाभरात गहजब माजला आहे. बॅँकेत अनेक गैरप्रकार झालेले आहेत, त्यातील मुख्य म्हणजे २०१० मध्ये झालेले २५० कर्मचाऱ्यांचे भरती प्रकरण. या प्रकरणात अनेकांनी आपले हात ओले करू घेतले. या प्रकरणावर शासकीय तपासणीसांनी ठपका ठेवलेला आहे. या प्रकरणात अद्यापही सोनवणे हे अधिकारी चौकशी करीत आहेत. गंभीर प्रकरण असताना, यास कासव गती व टाकसाळे यांचे प्रकरण ‘एक्सप्रेस’ सारके हाताळले गेले? असे का? इतर प्रकरणेही निकाली काढा? अशी मागणी अ‍ॅड. राहुल मस्के यांनी केली आहे. बँकेतून अनेकांना बेकायदेशीर कर्ज वाटप करण्यात आले, तारण नसताना कर्ज, असुरक्षित कर्ज, क्षेत्र नसताना कर्ज, कर्जाचा दिलेल्या कारणासाठी विनीयोग न करणे आदी प्रकरणात कलम ८८ नुसार डीडीआर वांगे यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या चौकशीचा फार्सही दिवसेंदिवस सुरू आहेत. त्यातून ठोस काही समोर येत नाही. या संदर्भात वांगे म्हणाले, शासकीय नियमानुसार चौकशी सुरू आहे. विशेश म्हणजे काही प्रकरणात पोलीस कारवाई करा, असे चौकशी अधिकाऱ्याने सूचविलेले आहे, यास वरिष्ठ स्तरावरून ‘स्टे’ असल्याचे बॅँकेतूनच सांगण्यात येते. बॅँकेत असा प्रकार होत असेल तर सामान्यांना न्याय कधी मिळणार?, दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी उपस्थित केला आहे. गतवर्षी बॅँकेत ४ कोटींचा पीक विमा घोटाळा झाला. यात आठ ते दहा जण दोषी आहेत. त्यांच्यावर आॅडीटर यांनी ठपका ठेवला आहे. ४ कोटींचा गैरव्यवहार झाल्यानंतरही त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप राजाभाऊ देशमुख यांनी केला आहे. यासह असुरक्षित कर्ज वाटपाचा अहवाल २०१० मध्ये विभागीय सहनिबंधक कांबळे यांनी दिला आहे. यामध्ये २० अधिकाऱ्यांना व १७० कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पदोन्नत्या दिल्याचा ठपका ठेवला आहे. हा मुद्दाही अद्याप बासणात आहे. बॅँकेतील गैरव्यवहरांच्या प्रकरणातील अनेक चौकशा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबत असतानाच साडेतीनशे कोटींच्या ठेवी देणारे, तीनशे कोटींची वसुली करणारे व दोषींवर कायदेशीर कारवाई करणारे तत्कालीन प्रशासक यांच्यावरच जलद कारवाई कशी होते? असा प्रश्न करून इतरांच्याही चौकशा पूर्ण करून दोषींवर कारवाईची मागणी शेतकरी संघटनेचे नेते कालीदास आपेट यांनी केली आहे. रोखे घोटाळ्यातील दोषींवर कारवाईचा ‘फार्स’बॅँकेत २००७-२००८ मध्ये तब्बल ६ कोटी ४० लाख रुपयांचा रोखे घोटाळा झाला होता. यामध्ये बॅँकेतील अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. सदर पैसे चुकीच्या पद्धतीने गुंतविल्याने बॅँकेचे मोठे नुकसान झाले. यामध्येही चौकशी झाली, काही दोषी आढळले. मात्र, पुन्हा चौकशीचा घाट घालण्यात आला. यामुळे ठपका असलेले काही सेवा करून निवृत्त झाले तर काही अद्यापही बॅँकेत उजळ माथ्याने काम करीत आहेत. मग अशांवर कारवाई कधी? ज्यांनी सामान्यांच्या पैशांची विल्हेवाट लावली त्यांना का पाठीशी घातले जातेय? असा प्रश्न भाई मोहन गुंड यांनी उपस्थित केला आहे.