शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा?

By विकास राऊत | Updated: April 23, 2024 13:10 IST

१३ मे रोजी होणार मतदान: कडक उन्हाळ्यात होईल सर्व प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. कडक उन्हाळ्यात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडतो आहे. उमेदवारांसाठी नेत्यांच्या सभांची मांदियाळी सर्वत्र दिसत असून, पहिल्या टप्प्यात मतदानही झाले आहे. सात टप्प्यात देशभर मतदान होणार असून ते सर्व उन्हाळ्यात होणार आहे. १३ मे रोजी कडक उन्हाळ्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे पहिल्या टप्प्यातील आकड्यांवरून दिसते आहे. ऋतू, तापमान की मतदारांमध्ये असलेला निरुत्साह, याचा परिणाम होतो की नाही, याचा आजवरच्या निवडणुकींचा आलेख पाहिला तर काय लक्षात येते पाहू.

हिवाळ्यात झाले मतदान१९५२ ते १९६७ या चार निवडणुका, १९८० ते १९८९ या काळातील निवडणुका ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात म्हणजे हिवाळ्यामध्ये निवडणुकांसाठी मतदान झाले. ८ निवडणुकांसाठी उन्हाळ्यात मतदान झाले आहे.

वर्ष ............ महिना.............. कोणत्या ऋतूत निवडणुका ...................             मतदान (टक्के)१९७२...... मार्च.....................उन्हाळा ...........................५२.६६१९७७..... मार्च .......... ........उन्हाळा ............................५६.१७१९८०.....जानेवारी...............हिवाळा .............................४५.०८१९८४......डिसेंबर ...............हिवाळा ............................५८.७८१९८९.....नोव्हेंबर ..............हिवाळा ..............................५९.९४१९९१....मे ....................उन्हाळा ...............................४८.६७१९९६......एप्रिल............उन्हाळा ................................५२.८९१९९८....फेब्रुवारी .............हिवाळा .............................६१.०४१९९९....ऑक्टोबर ............हिवाळा .............................६६.०६२००४....एप्रिल ................उन्हाळा ..............................५४.३०२००९.....एप्रिल ............उन्हाळा ............................५१.५६२०१४....एप्रिल ..............उन्हाळा ............................६१.८५२०१९....एप्रिल ...............उन्हाळा ....................६३.४८

दोनवेळा झाला मतदानावर परिणाम१९८०मध्ये हिवाळ्यात निवडणुका झाल्या तरीही मतदानाचा टक्का कमी होता. ४५.८० टक्के मतदान त्या साली झाले होते. १९९१ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ४८.६७ टक्के मतदान झाले होते. २००९ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ५१.५६ टक्के मतदान झाले होते.

मागच्या निवडणुकीत बऱ्यापैकी मतदान२०१९च्या निवडणुकीत जिल्ह्यात ६३.४८ टक्के मतदान झाले. आजवरच्या निवडणुकींपैकी हे मतदान बऱ्यापैकी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

यंदा मतदानादिवशी तापमान चाळिशी पार असणार१३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. वैशाखात मतदानाची तारीख असून, या काळात उन्हाचा कडाका जास्त असतो. तापमान चाळिशी पार असेल. त्यामुळे मतदानावर तापमानाचा परिणाम होतो की नाही, हे पाहावे लागेल.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४