शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

जेव्हा वाढले होते तापमान, तेव्हा मतदानात झाली होती घट; १३ मे रोजी किती असेल उष्णतेचा पारा?

By विकास राऊत | Updated: April 23, 2024 13:10 IST

१३ मे रोजी होणार मतदान: कडक उन्हाळ्यात होईल सर्व प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. कडक उन्हाळ्यात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडतो आहे. उमेदवारांसाठी नेत्यांच्या सभांची मांदियाळी सर्वत्र दिसत असून, पहिल्या टप्प्यात मतदानही झाले आहे. सात टप्प्यात देशभर मतदान होणार असून ते सर्व उन्हाळ्यात होणार आहे. १३ मे रोजी कडक उन्हाळ्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे पहिल्या टप्प्यातील आकड्यांवरून दिसते आहे. ऋतू, तापमान की मतदारांमध्ये असलेला निरुत्साह, याचा परिणाम होतो की नाही, याचा आजवरच्या निवडणुकींचा आलेख पाहिला तर काय लक्षात येते पाहू.

हिवाळ्यात झाले मतदान१९५२ ते १९६७ या चार निवडणुका, १९८० ते १९८९ या काळातील निवडणुका ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात म्हणजे हिवाळ्यामध्ये निवडणुकांसाठी मतदान झाले. ८ निवडणुकांसाठी उन्हाळ्यात मतदान झाले आहे.

वर्ष ............ महिना.............. कोणत्या ऋतूत निवडणुका ...................             मतदान (टक्के)१९७२...... मार्च.....................उन्हाळा ...........................५२.६६१९७७..... मार्च .......... ........उन्हाळा ............................५६.१७१९८०.....जानेवारी...............हिवाळा .............................४५.०८१९८४......डिसेंबर ...............हिवाळा ............................५८.७८१९८९.....नोव्हेंबर ..............हिवाळा ..............................५९.९४१९९१....मे ....................उन्हाळा ...............................४८.६७१९९६......एप्रिल............उन्हाळा ................................५२.८९१९९८....फेब्रुवारी .............हिवाळा .............................६१.०४१९९९....ऑक्टोबर ............हिवाळा .............................६६.०६२००४....एप्रिल ................उन्हाळा ..............................५४.३०२००९.....एप्रिल ............उन्हाळा ............................५१.५६२०१४....एप्रिल ..............उन्हाळा ............................६१.८५२०१९....एप्रिल ...............उन्हाळा ....................६३.४८

दोनवेळा झाला मतदानावर परिणाम१९८०मध्ये हिवाळ्यात निवडणुका झाल्या तरीही मतदानाचा टक्का कमी होता. ४५.८० टक्के मतदान त्या साली झाले होते. १९९१ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ४८.६७ टक्के मतदान झाले होते. २००९ साली उन्हाळ्यात मतदान असल्यामुळे ५१.५६ टक्के मतदान झाले होते.

मागच्या निवडणुकीत बऱ्यापैकी मतदान२०१९च्या निवडणुकीत जिल्ह्यात ६३.४८ टक्के मतदान झाले. आजवरच्या निवडणुकींपैकी हे मतदान बऱ्यापैकी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

यंदा मतदानादिवशी तापमान चाळिशी पार असणार१३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. वैशाखात मतदानाची तारीख असून, या काळात उन्हाचा कडाका जास्त असतो. तापमान चाळिशी पार असेल. त्यामुळे मतदानावर तापमानाचा परिणाम होतो की नाही, हे पाहावे लागेल.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४