शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

‘माकणी’त जेमतेम पाणीसाठा

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

उमरगा : शहरासह अन्य ५० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या माकणी धरणातील पाणी साठ्याच्या प्रमाणात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमालीची घट होत

उमरगा : शहरासह अन्य ५० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या माकणी धरणातील पाणी साठ्याच्या प्रमाणात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, माकणी धरणात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या टंचाईचे संकट नसले तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील माकणी धरणातून उमरगा शहरासह निलंगा, हसलगण जलशुद्धीकरण केंद्र, माकणी जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणार्‍या भूकंपग्रस्त ५२ गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणाच्या ८० कि.मी. डाव्या कालव्यावर ८ हजार ५३५ हेक्टर लागवडीचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. तर ८० कि.मी. च्या उजव्या कालव्यावर ६५३० हेक्टर लागवडीचे सिंचनक्षेत्र अवलंबून आहे. या दोन्ही कालव्याच्या पाण्यावर खरीपातील संकरित ज्चारी, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग खरीप भाजीपाला इत्यादी ५० टक्के राजकीय पिके घेतली जातात. गहू, ज्वारी, करडी, हरभरा, रबी भाजीपाला इत्यादी ७५ टक्के रबी पिके घेतली जातात. मागील दोन वर्षापासून या धरणात दोन्ही कालव्याद्वारे सोडण्याइतपत पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याने या कालव्याच्या पाण्यावर आधारीत असलेले सिंचनाचे क्षेत्र कोरडेठाक आहे. या धरणाची शीर्ष पातळी ६०८.१० मिटर असून, जलाशयाची पातळी ६०५.४० मीटर आहे. पूर्ण पातळी ६०.४ मीटर आहे. या धरणात १९ मे रोजी १७.७७७ दलघमि पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातील पाणीसाठ्यात कमालीच्या उकाड्यामुळे दिवसाकाठी ०.७ दलघमि पाण्याचे बाष्पीभवन होत असून, निलंगा, उमरगा, भूकंपग्रस्त ५२ गावे पाणीपुरवठा योजना २०० हेक्टर सिंचन क्षेत्र प्रतिमहा ३६ दलघमी पाण्याचा वापर होत आहे. उमरगा शहरासाठी प्रतिमहा १५ दलघमि तर निलंगा शहरासाठी ०६ दलघमि पाणी वापरण्यात येत आहे. सद्यस्थितीला या धरणात १ कोटी ७८ लाख घनमीटर तर १० अब्ज ७८ कोटी लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. येथून जवळच असलेल्या लोकमंगल कारखान्याचा पाणी पुरवठा कारखाना बंद असल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर) मागील दोन वर्षापासून पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने या धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नाही. असलेल्या पाण्याचा वापर उमरगा शहर पाणी पुरवठा योजना, निलंगा शहर पूरक पाणी पुरवठा योजना, माकणी व हसलगण जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणार्‍या भूकंपग्रस्त गावासाठी केला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन सिंचन क्षेत्रासाठी होणारा वापर यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. या धरणात वरील गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी पुरेसे असून, धरणात एक वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असला तरी भविष्यातील संभाव्य पाणी टंचाईचा धोका लक्षात घेवून या धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले.