शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पाणीपुरवठ्यास तासन्तास उशीर

By admin | Updated: September 19, 2014 01:16 IST

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आज कोलमडले.

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आज कोलमडले. सकाळी ६ वाजता होणारा पाणीपुरवठा दुपारी ११ वा झाला. उशिरा का होईना, परंतु पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.पाण्यासाठी अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला. १५ ते १७ सप्टेंबरपर्यंत शहराला निर्जळीचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांना महागड्या टँकर्सवर पाण्याची गरज भागवावी लागली. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. आज ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता, त्या वसाहतींना चार तास उशिरा पाणी आले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केलेल्या कॉल सेंटरने चुकीची माहिती दिल्यामुळे कोणत्या भागात कधी पाणी येणार हे नागरिकांना सांगताना नगरसेवकांची दमछाक झाली. अनागोंदी कारभारनगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले, पाणीपुरवठा झाला. मात्र, चार तास उशिराने. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जे कॉल सेंटर स्थापन केले आहेत. त्यांच्याकडे नगरसेवकांचे फोन नंबर्स चुकीचे आहेत.विठ्ठलनगरचा नगरसेवक म्हणून राठोड यांना फोन करून पाणीपुरवठा उशिरा होणार असल्याचे कॉल सेंटरवरून सांगण्यात आले. मग एन-३, एन-४ ची माहिती त्यांनी कुणाला दिली, असा प्रश्न आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या खाजगीकरणामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, असा आरोप राठोड यांनी केला. तसेच प्रत्येक प्रभागनिहाय पाणीपुरवठा समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली.