शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ यापैकी एका गावात टँकरने तर उर्वरित २२ गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ मागील वर्षी भोकर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला़ यामुळे तालुक्यातील सुधा प्रकल्पासह सर्व लहान मोठे तलाव शंभर टक्के भरले़ दरवर्षी तालुक्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई भेडसावत होती़ पण यावर्षी एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली़ सध्या २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ यापैकी कामनगाव येथे टँकरने पणीपुरवठा सुरू करण्यात आला असून जगराम तांडा, मसाईनगर, धावरी बु़, पांडुरणा, पाळी, सोनारी, गारगोटवाडी, चिंचाळा, कोळगाव खु़, विष्णूनगर, सोमठाणा, मसलगा, अम्रुनाईकतांडा, नसलापूर, किशननाईकतांडा, सावरगाव (माळ), जांभळी, कांडली, बल्लाळ, धावरी खु़, हाडोळी, दिवशी खु़ तांडा, नांदा खु़ तांडा येथील बोअर अथवा विहिरी अधिग्रहण करण्यात येत आहेत़ पावसाळा सुरू होण्यास आणखी कालावधी असल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांत भर पडणार आहे़ अधिग्रहण केलेल्या गावांची संख्या २२ असून या गावांना विजेच्या लपंडावाचाही त्रास सहन करावा लागतो. रात्री-बेरात्री ग्रामस्थांना पाणी भरावे लागत आहे़ यामुळे शेतीच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे़ (वार्ताहर) ३५ वर्षांत तीन योजना ३५ वर्षांत तीन योजना राबवूनसुद्धा गारगोटवाडीच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची बातमी लोकमतमधून प्रसिद्ध होताच या गावात अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ यामुळे गावकर्‍यांना दिलासा मिळाला असून यात महत्त्वाची भूमिका तहसीलदार महेश परांडेकर यांनी निभावली़