शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ कार्यशाळा

By admin | Updated: January 9, 2015 00:52 IST

बीड : राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मार्च महिन्यापासून सुरवात होत आहे.

बीड : राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मार्च महिन्यापासून सुरवात होत आहे. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गाव समितीपासून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना जलसंधारणचे सचिव प्रभाकर देशमुख व इतर आयुक्तांनी कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन केले.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरूवारी ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सचिव प्रभाकर देशमुख, औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित,आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते. योजना प्रभावीपणे राबविल्यास राज्य पाणीटंचाईतून मुक्त होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावाला केंद्रबिंदू मानून कर्मचाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्याची पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाची रुपरेषा यावेळी मांडण्यात आली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही योजना राज्यात कार्यन्वित होणार आहे. योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत राज्य पाणीटंचाईतून मुक्त करण्याचा निर्धार असून ही योजना स्थानिक पातळीवर कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.राज्यात २० हजार सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. योजनेत नरेगा, पाणलोट प्रकल्प हे एकत्र राबविणार असल्याचे सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले. जलपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, नरगेच्या योजनेतील कामे तर कृषि विभागातील योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)सध्या राज्यातील २३ हजार गावात पाणीटंचाई जाणवत आहे. योजनेत जुने ८ हजार सिमेंट बंधारे दुरूस्त होणार आहेत. विभागाप्रमाणे ६ हजार बंधाऱ्याचे वाटप होणार आहे. शिवाराचा आराखडा पाहून नव्याने कामे दिली जातील, असेही सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले. योजनेअंतर्गत राज्यातील ५ हजार गावांची पाणीटंचाई दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.