शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

टँकरमधून पाण्याची गळती

By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे.

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे. अनेक टँकरमधून पाण्याची गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.आष्टी तालुक्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील तब्बल ६३ गावांना व १०७ वाड्यांना ८० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तब्बल १ लाख ७७ लोकांची तहान टँकरद्वारे भागविली जात असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. यासाठी टँकरच्या दररोज २०० खेपा केल्या जात आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू असून अनेक टँकरच्या टाक्यांना छिद्र पडलेले आहेत. एकीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तर टँकरमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. टँकरमधून वाया जाणाऱ्या पाण्याकडे प्रशासनासह संबंधित टँकर चालकाचे लक्ष नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी केली आहे. टँकरमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीसंदर्भात आष्टी पं.स.चे गटविकास अधिकारी उद्धव सानप म्हणाले की, पाणी गळती होणाऱ्या टँकरची तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात येईल. (वार्ताहर)