शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाणी मुबलक, पण क्षमता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:58 IST

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहागंज पाण्याच्या टाकीवर जवळपास ४० वॉर्डांमधील पाच लाख नागरिकांची तहान अवलंबून आहे

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहागंज पाण्याच्या टाकीवर जवळपास ४० वॉर्डांमधील पाच लाख नागरिकांची तहान अवलंबून आहे. टाकीत साठवण क्षमताच नसल्याने जायकवाडीहून येणारे पाणी जवळपास २० तास बंद ठेवावे लागते. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी या टाकीवर नगरसेवकांमध्ये रणकंदन सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात नगरसेवक अक्षरश: टाकीतील पाण्यावर दरोडा टाकतात. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सिटी वॉटर युटिलिटी कंपनी दुर्लक्ष करीत आहे.शहागंज येथील पाण्याची टाकी १९७२ मध्ये बांधण्यात आली. ४४ वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून टाकीचे डिझाईन तयार करण्यात आले. अगोदर हर्सूल तलावातील पाणी टाकीत नियमित येत असे. हे पाणी कमी पडू लागल्याने नंतर जायकवाडीहून ७०० मि. मी. व्यासाच्या पाईपद्वारे पाणी टाकीत आणण्यात आले. टाकीच्या खाली फक्त २ लाख ७५ हजार लिटर साठवण क्षमतेचा हौद बांधण्यात आला. तब्बल ३० फूट उंचीवर २३ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. लोकसंख्या वाढू लागल्याने नंतर १४०० मि. मी. व्यासाची लाईनही आणण्यात आली.जायकवाडीहून येणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या लाईनचेच पाणी हौदात सोडण्यात येते. १४०० मि. मी. व्यासाची लाईन किमान २० तास बंद ठेवावी लागते. टाकीच्या खाली साठवण क्षमता अत्यंत कमी आहे. दोन पंपाद्वारे २४ तास पाणी टाकीवर चढविण्यात येते. अडीच तासात टाकी भरते आणि एक तासात रिकामी होते. टाकीच्या बाजूला किमान २० लाख लिटर क्षमतेचा हौद बांधवा ही मागणी मागील दोन दशकांपासून करण्यात येत आहे. याकडे मनपाने कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील दीड वर्षापासून शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंपनीलाही याच्याशी काहीच देणे-घेणे नाही.सध्या २५ वॉर्डांना थेट पाणीशहागंज पाण्याच्या टाकीवरून जुन्या शहरातील २५ वॉर्डांना थेट पाणीपुरवठा करण्यात येतो. आपल्याच वॉर्डातील नागरिकांना जास्तीत जास्त पाणी मिळावे म्हणून नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते टाकीवर तळ ठोकून असतात. टाकी भरल्यावर आपल्याच वॉर्डाचा ‘टप्पा’(पाणीपुरवठा) सुरू करावा, असा आग्रह नगरसेवकांचा असतो.दिल्लीगेटलाही पाणीहर्सूल तलाव आटल्याने दिल्लीगेट येथील पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १३ पेक्षा अधिक वॉर्डांना शहागंजहून पाणी द्यावे लागते. हत्तेसिंगपुरा येथेही अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी बांधून ठेवण्यात आली होती. आता या टाकीवरूनही लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.