शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात ...

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात वरूणराजाच्या कृपेने सर्व मोठ्या, लहान, मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी असले तरी उन्हाळी पाणी आवर्तनासाठी ते पाणी सोडल्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे नसणे आणि प्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे हे पाणी शेतीला मिळण्याऐवजी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जायकवाडी, नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना प्रकल्पांमधून उन्हाळी पिकांसाठी आवर्तने (पाणी सोडणे) १ मार्चपासून देण्यात येणार आहेत. यावर्षी मराठवाड्यातील ११ मोठ्या, ७५ मध्यम, ७४९ लघु आणि मांजरा आणि तेरणावरील ३७ अशा ८७२ प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पांद्वारे १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक धरणांना गळती लागलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुखना, ढेकू, खेळणा, केसापुरी,लहूकी, अंजना, पळशी यासारख्या अनेक प्रकल्पांना लहान-मोठी गळती लागलेली आहे. विभागात ३ हजार ४८ कोल्हापुरी बंधाऱ्यांना ३७ हजार ६०१ दरवाजे नाहीत. कालव्यातील गाळ, झाडेझुडपे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून काढलेली नाहीत. त्यामुळे आवर्तनातून सोडण्यात आलेले पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यातच जलसंपदा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. केवळ २८ कर्मचाऱ्यांवर सिंचनाचा खेळ सुरू आहे. गेल्यावर्षी पाणी असतानाही ३० टक्के पाणी शेतीला मिळाले. यामागे एकमेव कारण म्हणजे मोडकळीस आलेली यंत्रणा आहे.

वितरण व्यवस्थाच मोडकळीला

रब्बीचे आवर्तन सध्या सुरू आहे. कालव्यांची वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली असल्याने तेच पाणी पूर्णत: शेतीला मिळाले नाही. ६७ प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र, हे काम मार्गी लागलेले नाही. देखभाल, दुरूस्तीअभावी सर्व काही ठप्प आहे. वितरण, कालवे यांची देखभाल, दुरूस्ती झाली तर शेतीपर्यंत पाणी जाईल अन्यथा जाणार नाही. वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. मनुष्यबळ नाही, अनेक प्रकल्पांना गळती लागलेली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे सुरू असल्याचे मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी

कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले, जलसंपदा विभागावर आवर्तन देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी आहे. त्या विभागाला देखभाल आणि दुरूस्तीबाबत अवगत केले आहे. मागील काही दिवसात बरीच कामे झाली आहेत, त्यामुळे उन्हाळी आवर्तनातील पाण्यातून मुबलक सिंचन होईल, अशी अपेक्षा आहे.