शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात ...

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात वरूणराजाच्या कृपेने सर्व मोठ्या, लहान, मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी असले तरी उन्हाळी पाणी आवर्तनासाठी ते पाणी सोडल्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे नसणे आणि प्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे हे पाणी शेतीला मिळण्याऐवजी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जायकवाडी, नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना प्रकल्पांमधून उन्हाळी पिकांसाठी आवर्तने (पाणी सोडणे) १ मार्चपासून देण्यात येणार आहेत. यावर्षी मराठवाड्यातील ११ मोठ्या, ७५ मध्यम, ७४९ लघु आणि मांजरा आणि तेरणावरील ३७ अशा ८७२ प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पांद्वारे १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक धरणांना गळती लागलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुखना, ढेकू, खेळणा, केसापुरी,लहूकी, अंजना, पळशी यासारख्या अनेक प्रकल्पांना लहान-मोठी गळती लागलेली आहे. विभागात ३ हजार ४८ कोल्हापुरी बंधाऱ्यांना ३७ हजार ६०१ दरवाजे नाहीत. कालव्यातील गाळ, झाडेझुडपे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून काढलेली नाहीत. त्यामुळे आवर्तनातून सोडण्यात आलेले पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यातच जलसंपदा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. केवळ २८ कर्मचाऱ्यांवर सिंचनाचा खेळ सुरू आहे. गेल्यावर्षी पाणी असतानाही ३० टक्के पाणी शेतीला मिळाले. यामागे एकमेव कारण म्हणजे मोडकळीस आलेली यंत्रणा आहे.

वितरण व्यवस्थाच मोडकळीला

रब्बीचे आवर्तन सध्या सुरू आहे. कालव्यांची वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली असल्याने तेच पाणी पूर्णत: शेतीला मिळाले नाही. ६७ प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र, हे काम मार्गी लागलेले नाही. देखभाल, दुरूस्तीअभावी सर्व काही ठप्प आहे. वितरण, कालवे यांची देखभाल, दुरूस्ती झाली तर शेतीपर्यंत पाणी जाईल अन्यथा जाणार नाही. वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. मनुष्यबळ नाही, अनेक प्रकल्पांना गळती लागलेली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे सुरू असल्याचे मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी

कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले, जलसंपदा विभागावर आवर्तन देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी आहे. त्या विभागाला देखभाल आणि दुरूस्तीबाबत अवगत केले आहे. मागील काही दिवसात बरीच कामे झाली आहेत, त्यामुळे उन्हाळी आवर्तनातील पाण्यातून मुबलक सिंचन होईल, अशी अपेक्षा आहे.