शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात ...

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचनाची वाट अडचणीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागात गेल्या पावसाळ्यात वरूणराजाच्या कृपेने सर्व मोठ्या, लहान, मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी असले तरी उन्हाळी पाणी आवर्तनासाठी ते पाणी सोडल्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे नसणे आणि प्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे हे पाणी शेतीला मिळण्याऐवजी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जायकवाडी, नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना प्रकल्पांमधून उन्हाळी पिकांसाठी आवर्तने (पाणी सोडणे) १ मार्चपासून देण्यात येणार आहेत. यावर्षी मराठवाड्यातील ११ मोठ्या, ७५ मध्यम, ७४९ लघु आणि मांजरा आणि तेरणावरील ३७ अशा ८७२ प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पांद्वारे १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक धरणांना गळती लागलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुखना, ढेकू, खेळणा, केसापुरी,लहूकी, अंजना, पळशी यासारख्या अनेक प्रकल्पांना लहान-मोठी गळती लागलेली आहे. विभागात ३ हजार ४८ कोल्हापुरी बंधाऱ्यांना ३७ हजार ६०१ दरवाजे नाहीत. कालव्यातील गाळ, झाडेझुडपे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून काढलेली नाहीत. त्यामुळे आवर्तनातून सोडण्यात आलेले पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यातच जलसंपदा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. केवळ २८ कर्मचाऱ्यांवर सिंचनाचा खेळ सुरू आहे. गेल्यावर्षी पाणी असतानाही ३० टक्के पाणी शेतीला मिळाले. यामागे एकमेव कारण म्हणजे मोडकळीस आलेली यंत्रणा आहे.

वितरण व्यवस्थाच मोडकळीला

रब्बीचे आवर्तन सध्या सुरू आहे. कालव्यांची वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली असल्याने तेच पाणी पूर्णत: शेतीला मिळाले नाही. ६७ प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र, हे काम मार्गी लागलेले नाही. देखभाल, दुरूस्तीअभावी सर्व काही ठप्प आहे. वितरण, कालवे यांची देखभाल, दुरूस्ती झाली तर शेतीपर्यंत पाणी जाईल अन्यथा जाणार नाही. वितरण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. मनुष्यबळ नाही, अनेक प्रकल्पांना गळती लागलेली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे सुरू असल्याचे मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी

कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले, जलसंपदा विभागावर आवर्तन देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी आहे. त्या विभागाला देखभाल आणि दुरूस्तीबाबत अवगत केले आहे. मागील काही दिवसात बरीच कामे झाली आहेत, त्यामुळे उन्हाळी आवर्तनातील पाण्यातून मुबलक सिंचन होईल, अशी अपेक्षा आहे.