शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला; एक ठार

By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST

वडोदबाजार : औरंगाबादेत लग्न समारंभ आटोपून अजिंठा गावी परतताना खड्डा चुकविताना वऱ्हाडाचा टेम्पो औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील पाथ्री गावाजवळ उलटला. या अपघातात मुलगी ठार झाली असून ३५ जण जखमी झाले.

वडोदबाजार : औरंगाबादेत लग्न समारंभ आटोपून अजिंठा गावी परतताना खड्डा चुकविताना वऱ्हाडाचा टेम्पो औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील पाथ्री गावाजवळ उलटला. या अपघातात एक दहा वर्षीय मुलगी ठार झाली असून जवळपास ३५ जण जखमी झाले. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.अजिंठा येथील जावेद युसूफ शेख या तरुणाचा शुक्रवारी औरंगाबाद येथील चिकलठाण परिसरात विवाह समारंभ झाला. हा विवाह समारंभ आटोपून नातेवाईक टेम्पोने (क्र. एमएच- १५ जी-४८६७) अजिंठा गावी परतत होते. फुलंब्रीहून पुढे आल्यानंतर पाथ्री गावाजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन उलटला. या वाहनात अजिंठा, भराडी, ढालसावंगी, गोद्री व इतर गावांतील नातेवाईक बसलेले होते. टेम्पो उलटल्याने सर्वच जवळपास ३५ जणांना मार लागला. घटनास्थळी पडलेले रक्त, विखुरलेल्या चपला-बुट, जखमींचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. पाथ्री व आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करून सर्व जखमींना आळंद, फुलंब्री, येथील रुग्णवाहिकेद्वारे घाटीत हलविले. उमाजी सहाने, भागीनाथ म्हस्के, काकासाहेब मोटे, योगेश पाथ्रीकर, सोमीनाथ सोनवणे, भानुदास तायडे, सोमीनाथ करपे यांच्यासह अनेकांनी मदत केली. सपोनि दिलीप सागर, नंदकुमार दांडगे, सोमीनाथ मुरकुटे, वाघमारे, साळवे आदींनी वाहतूक सुरळीत केली.मृत अन् जखमींची नावेया अपघातात शेख आयशाबी शेख सुभान (१२, रा. गोद्री, ता. भोकरदन) या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती अजिंठ्याच्या उपसरपंचांनी दिली.शेख भिकन शेख मस्तान, शेख नदीम शेख कलीम, मुक्तार खाँ बुढन खाँ पठाण, ताहेराबी शेख अब्बास, आशिकी बुढन खाँ पठाण, अहमद इरफान पठाण, शेख भिक्की शेख अहमद (सर्व रा. अन्वा, ता. भोकरदन) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्व जखमींवर फुलंब्री उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.इतर जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. सर्व जखमींना विविध रूग्णवाहिकांद्वारे दवाखान्यात पोहोचविण्यात आले.औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्यफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.औरंगाबाद-जळगाव राज्य रस्ता क्रमांक आठ आहे. ऐतिहासिक अजिंठा लेणीला जाण्यासाठी हा एकमेव सरळ मार्ग आहे. या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यात पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. औरंगाबाद येथील टी पॉइंट (हर्सूल जेल) पासून हा रस्ता खराब झालेला आहे. नगरपालिकेचा जकात नाका, सावंगी, चौका घाट, गणोरी फाटा, बिल्डानजीक मठपाटी, जुने तहसील कार्यालय, फुलंब्री शहरातून जाणारा रस्ता या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर बाजार समितीनजीक शुक्रवारी दोन दुचाकीस्वार खड्डा वाचविण्याच्या नादात खाली पडले. हे प्रकार दररोज घडत आहेत. या रस्त्याची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. (वार्ताहर)