शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला; एक ठार

By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST

वडोदबाजार : औरंगाबादेत लग्न समारंभ आटोपून अजिंठा गावी परतताना खड्डा चुकविताना वऱ्हाडाचा टेम्पो औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील पाथ्री गावाजवळ उलटला. या अपघातात मुलगी ठार झाली असून ३५ जण जखमी झाले.

वडोदबाजार : औरंगाबादेत लग्न समारंभ आटोपून अजिंठा गावी परतताना खड्डा चुकविताना वऱ्हाडाचा टेम्पो औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील पाथ्री गावाजवळ उलटला. या अपघातात एक दहा वर्षीय मुलगी ठार झाली असून जवळपास ३५ जण जखमी झाले. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.अजिंठा येथील जावेद युसूफ शेख या तरुणाचा शुक्रवारी औरंगाबाद येथील चिकलठाण परिसरात विवाह समारंभ झाला. हा विवाह समारंभ आटोपून नातेवाईक टेम्पोने (क्र. एमएच- १५ जी-४८६७) अजिंठा गावी परतत होते. फुलंब्रीहून पुढे आल्यानंतर पाथ्री गावाजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन उलटला. या वाहनात अजिंठा, भराडी, ढालसावंगी, गोद्री व इतर गावांतील नातेवाईक बसलेले होते. टेम्पो उलटल्याने सर्वच जवळपास ३५ जणांना मार लागला. घटनास्थळी पडलेले रक्त, विखुरलेल्या चपला-बुट, जखमींचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. पाथ्री व आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करून सर्व जखमींना आळंद, फुलंब्री, येथील रुग्णवाहिकेद्वारे घाटीत हलविले. उमाजी सहाने, भागीनाथ म्हस्के, काकासाहेब मोटे, योगेश पाथ्रीकर, सोमीनाथ सोनवणे, भानुदास तायडे, सोमीनाथ करपे यांच्यासह अनेकांनी मदत केली. सपोनि दिलीप सागर, नंदकुमार दांडगे, सोमीनाथ मुरकुटे, वाघमारे, साळवे आदींनी वाहतूक सुरळीत केली.मृत अन् जखमींची नावेया अपघातात शेख आयशाबी शेख सुभान (१२, रा. गोद्री, ता. भोकरदन) या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती अजिंठ्याच्या उपसरपंचांनी दिली.शेख भिकन शेख मस्तान, शेख नदीम शेख कलीम, मुक्तार खाँ बुढन खाँ पठाण, ताहेराबी शेख अब्बास, आशिकी बुढन खाँ पठाण, अहमद इरफान पठाण, शेख भिक्की शेख अहमद (सर्व रा. अन्वा, ता. भोकरदन) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्व जखमींवर फुलंब्री उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.इतर जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. सर्व जखमींना विविध रूग्णवाहिकांद्वारे दवाखान्यात पोहोचविण्यात आले.औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्यफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.औरंगाबाद-जळगाव राज्य रस्ता क्रमांक आठ आहे. ऐतिहासिक अजिंठा लेणीला जाण्यासाठी हा एकमेव सरळ मार्ग आहे. या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यात पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. औरंगाबाद येथील टी पॉइंट (हर्सूल जेल) पासून हा रस्ता खराब झालेला आहे. नगरपालिकेचा जकात नाका, सावंगी, चौका घाट, गणोरी फाटा, बिल्डानजीक मठपाटी, जुने तहसील कार्यालय, फुलंब्री शहरातून जाणारा रस्ता या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर बाजार समितीनजीक शुक्रवारी दोन दुचाकीस्वार खड्डा वाचविण्याच्या नादात खाली पडले. हे प्रकार दररोज घडत आहेत. या रस्त्याची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. (वार्ताहर)