शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

देशात बेरोजगारी धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये १ हजार लोकसंख्येमागे केवळ १६ जणांना सद्यस्थितीत नोकरी प्राप्त होत ...

औरंगाबाद : केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये १ हजार लोकसंख्येमागे केवळ १६ जणांना सद्यस्थितीत नोकरी प्राप्त होत आहे. जगातील नॉर्वेमध्ये हेच प्रमाण १५९, स्वीडन १३८, फ्रान्स ११४, ब्राझील १११, अमेरिका ७७ आणि चीनमध्ये ५७ असे आहे. भारतात सुशासन निर्माण होत नाही. यासाठी सरकारी नोकर भरतीवर घातलेले निर्बंध हेच कारण आहे, असा दावा ज्येष्ठ कामगार नेते तथा अर्थविषयक अभ्यासक प्रा. अजित अभ्यंकर यांनी केला. देशातील बेरोजगारी धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. त्याकडे प्रत्येकाला लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'अबकी बार सिर्फ रोजगार ' या विषयावर प्रा. अजित अभ्यंकर यांचे रविवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. मारोती तेगमपुरे होते. प्रा. अभ्यंकर म्हणाले, कोरोनाच्या काळात विविध यंत्रे खरेदी केली. तेव्हा ते चालविण्यासाठी माणसे उपलब्ध नव्हती. कारण या विभागांमध्ये नोकरभरतीच केलेली नाही. उपकरणे खरेदी करता येऊ शकतात. पण ती चालवणारी सुशासन यंत्रणाच अस्तित्वात नसल्यामुळे आपली धांदल उडाली. याला केंद्र आणि राज्य शासनाची धोरणे कारणीभूत आहेत. बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे अनेक आहेत. त्यावर अनेक उपायही आहेत. त्यासाठी आर्थिक धोरण बदलण्याची गरज आहे. शासनाने विकासाच्या कार्यक्रमाची दिशा बदलली पाहिजे. नफ्यासाठी राज्य यंत्रणा चालवायच्या असतील तर हे शक्य होणार नाही. रोजगारासाठी राष्ट्रीय पातळीवर नागरी रोजगार हमी योजना सुरू केली पाहिजे. यात नागरी आणि ग्रामीण जीवन, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सर्वांना शिक्षण क्षेत्रात कार्य करावे लागणार असल्याचेही प्रा. अभ्यंकर यांनी सांगितले. रोजगाराच्या प्रश्नावर प्रत्येक संघटना, संस्था यांनी 'अब की बार सिर्फ रोजगार' हीच मागणी लावून धरली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा जिवरग यांनी केले. आभार डॉ.फिरोज सय्यद यांनी मानले. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्यात आली.

चौकट,

कृषी क्षेत्रात ४४ टक्के लोक काम करतात

कृषी क्षेत्रात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ७२ टक्के लोक काम करीत होते. आता ते प्रमाण ४४ टक्क्यांवर आले आहे. मात्र या ४४ टक्के लोकांचे उत्पन्न केवळ १४ टक्के एवढेच आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील रोजगार घटून इतर क्षेत्रात वाढले पाहिजेत. तरच शेतीला चांगले दिवस येतील, असे प्रा. अभ्यंकर यांनी सांगितले.