शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बीड बायपास सर्व्हिस रोडचे काम हाती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST

औरंगाबाद: बीड बायपास रोडवर होणाऱ्या सततच्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व्हिस रोडचे काम शासनाने हाती घेऊन निष्पाप लोकांचे जीव वाचवावेत, ...

औरंगाबाद: बीड बायपास रोडवर होणाऱ्या सततच्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व्हिस रोडचे काम शासनाने हाती घेऊन निष्पाप लोकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी महिलांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली.

जिजाऊ ब्रिगेड औरंगाबाद तसेच सातारा देवळाई जनसेवा महिला समितीने बीड बायपासवरील मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲड. वैशाली कडू, संगीता भुजंग, स्मिता पठारे, सुचिता कुलकर्णी, शुभांगी लातूरकर आदी महिलांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि आमदार अंबादास दानवे यांच्याकडे मागणीचे निवेदन देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

बीड बायपास रोडवर एका आठवड्यात ३ अपघात होऊन त्यामध्ये ४ जणांचा बळी गेला आहे. या सर्व घटना दोन ते तीन किलोमीटर अंतरातच झालेल्या आहेत. बीड बायपास रोडवर गेल्या तीन वर्षांत अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. सातारा देवळाई येथील रहिवासी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड व्हावा यासाठी आंदोलने करत आहेत. आता लोकांचा संयम संपलेला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

कॅप्शन....बीड बायपासवर सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करताना जिजाऊ ब्रिगेड औरंगाबाद आणि सातारा देवळाई जनसेवा महिला समितीच्या सदस्य.