शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दोन हजार शेतकऱ्यांनी घेतली आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ

By admin | Updated: December 12, 2014 00:53 IST

उमरगा : शेती व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक कारणांमुळे संकटे उभी ठाकली असली तरी याचा खंबीरपणे मुकाबला

उमरगा : शेती व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक कारणांमुळे संकटे उभी ठाकली असली तरी याचा खंबीरपणे मुकाबला करण्याचा निर्धार करतानाच सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ घेतली. गुरूवारी येथील तालुका कृषी कार्यालय व कृषी विभाग प्रकल्प संचालक ‘आत्मा’ यांच्या वतीने गटप्रमुखांच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शेतकऱ्यांनी हा निर्धार व्यक्त केला. शिबिराचे उद्घाटन विभागीय अधिकारी रवींद्र गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष चोले, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अर्चनाताई जिंतूरकर, अ‍ॅड. अमोल रणदिवे, भारत गर्जे, तहसीलदार उत्तमराव सबनीस, तालुका कृषी अधिकारी हनुमंतराव गोरे, मंडळ अधिकारी मुरलीधर जाधव, विजयकुमार कुलकर्णी, पर्यवेक्षक भानुदास ढोबळे, कृषी अधिकारी नंदकिशोर डांगे, प्रदीप भोसले आदींची उपस्थिती होती. प्रशिक्षणासाठी १८०० गटप्रमुखांसह शेतकऱ्यांनी सभासद नोंदणी केली होती. नापिकीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असले तरी शेतकऱ्यांनी आशावादी रहायला हवे. प्रशासनाबरोबरच शासन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. अशावेळी हिंमत न हारता या संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. गटांचे कर्तव्य, निवड, अधिकार याबाबत प्रकल्प संचालक चोले यांनी तर कंपनी स्थापना, व्यवहार, त्याचे फायदे आदींबाबत अ‍ॅड. रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. बँक खात्याचा योग्य वापर, आर्थिक व्यवहार, कर्ज प्रस्ताव, गटांचे ठराव, रेकॉर्ड ठेवण्याच्या पध्दती याबाबत खामसवाडी येथील भारत गर्जे यांनी मार्गदर्शन केले. तर शेती व्यवसायाशी सलग्नीत दुग्ध व्यवसाय, बंदिस्त शेळीपालन, कृषी उत्पादीत मालावर प्रक्रिया, आधुनिक शेती, चारा निर्मिती व त्याचा काटकसरीने वापर याबाबत जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी हनुमंत गोरे यांनी, सूत्रसंचालन विजयकुमार कुलकर्णी तर शेवटी मंडल कृषी अधिकारी मुरली जाधव यांनी आभार मानले. यावेळी शहरासह तालुक्यातीच्या ग्रामीण भागातून शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)