शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वीस दिवसांपासून तीन गावे अंधारात

By admin | Updated: June 23, 2014 00:21 IST

कडा: आष्टी तालुक्यात वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या तडाख्यात अनेकांची घरे पडली. शेती पिकांचे नुकसान झाले.

कडा: आष्टी तालुक्यात वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या तडाख्यात अनेकांची घरे पडली. शेती पिकांचे नुकसान झाले. यासह महावितरणचे खांबही पडले. महावितरणने पडलेले खांब अद्यापही दुरुस्त न केल्याने तालुक्यातील वटणवाडी, खाकाळवाडी, जळगाव या तीन गावांतील वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे.आष्टी तालुक्याला वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले होते. वादळाच्या तडाख्याने अनेकांचे पक्के, कच्च्या घरांसह गोठ्यांचेही नुकसान झाले होते. या आपत्तीत अनेक जनावरांसह कोंबड्याही दगावल्या होत्या. तालुक्यात कधी नव्हे ते इतके मोठे नैसर्गिक संकट आले. या वादळाचा तडाखा महावितरणलाही बसला. महावितरणचे अनेक विद्युत खांब पडले तर इतर डीपीही जळाल्या. या आपत्तीत महावितरणचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीतून अनेकजण सावरले असले तरी अद्यापही महावितरणला ‘शॉक’ बसलेलाच आहे. महावितरणचे कित्येक खांब अद्यापही पडलेले असून, ते दुरुस्त करण्याचे काम सुरुच आहे. गेल्या वीस दिवसांपासून वटणवाडी, खाकाळवाडी, जळगाव या परिसरातील विद्युत खांबांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा बंदच आहे.येथील विद्युत पुरवठा बंद असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महिला, वृद्ध, मुले यांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. महिलांना डोक्यावरुन पाणी आणावे लागते. यामुळे आजारही जडू लागले आहेत. तरुण मुले दुचाकीवरुन पाणी आणतात. यामुळे आर्थिक खर्चही वाढला आहे. वीस दिवस झाले तरीही येथील विद्युत पुरवठा सुरू होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत, यास महावितरणचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या दैवशाला शिरोळे यांनी केला.या परिसरात वीज नसल्याने शेतातील विद्युत पंपही बंद आहेत. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना विहिरीतून पाणी शेंदून जनावरांना पाजावे लागते.या परिसरातील काही शेतकऱ्यांकडे भाजीपाल्यासह जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचे पीक आहेत. यांना पाणी देण्यासही अडचणी निर्माण होत असल्याने ही पिकेही वाळून चालली आहेत. गावातील पिठाची गिरणीही बंद आहे. यामुळे ग्रामस्थांना कडा, आष्टी येथे जाऊन धान्य दळून आणावे लागते. एकंदरच या परिसरातील विद्युत पुरवठा २० दिवसांपासून बंद असल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील विद्युत पुरवठा तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा आठ दिवसांत दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दैवशाला शिरोळे, दादासाहेब जगताप, सचिन वाघुले यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. वटणवाडीसह परिसरातील तीन गावांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. या संदर्भात महावितरणचे कडा येथील कनिष्ठ अभियंता काळे म्हणाले, वादळी वाऱ्यासह पावसाने विद्युत खांब पडले आहेत. ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करु. (वार्ताहर)वादळाच्या तडाख्याने झाला होता बिघाडआष्टी तालुक्यात वीस दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेकांच्या घरांसह महावितरणचे खांबही पडलेतालुक्यातील वटणवाडी, जळगाव, खाकाळवाडी या परिसरातील विद्युत खांब अद्यापही दुरुस्त नसल्याने ग्रामस्थांवर अंधारात चाचपडण्याची आली वेळशेतातील विद्युत पंपही बंद असल्याने भाजीपाल्यासह जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न