शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बारा कोटींची दरवर्षी उधळपट्टी

By admin | Updated: August 1, 2016 00:10 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉक निर्माण झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांमध्ये या विभागातील सर्वच अधिकारी निवृत्त झाले आहेत.

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉक निर्माण झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांमध्ये या विभागातील सर्वच अधिकारी निवृत्त झाले आहेत. शहरात दिवे लागले किंवा नाही हे पाहण्यासाठीही अधिकारी नाहीत. शहरात पथदिवे आणि सामाजिक सभागृहांसाठी वीज कंपनीने लावलेले १०० पेक्षा अधिक मीटर बंद पडले आहेत. मागील काही वर्षांपासून वीज कंपनी मनपाला अ‍ॅव्हरेज बिल देत आहे. जिथे एका मीटरला १० ते १५ हजार रुपयांचे बिल अपेक्षित आहे, तिथे ४० ते ५० हजार रुपये बिल येत आहे. त्यामुळे बंद मीटरमुळे मनपाला महिन्याकाठी १ कोटी तर दरवर्षी सुमारे १२ कोटींचा आर्थिक फटका बसत आहे.मनपा प्रशासनाने तिजोरीत खडखडाट असल्याचे निमित्त करून शहरातील ११५ वॉर्डांमध्ये विकासकामे सुरू केलेली नाहीत. मनपाच्या या भूमिकेमुळे गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाची जाणीव मनपा प्रशासनाला अजिबात राहिलेली नाही. गुंठेवारीत आजही सहज फेरफटका मारल्यावर असे लक्षात येते की, या भागातील नागरिक कसे आयुष्य काढत असतील...! एकीकडे पैसे नाहीत म्हणून विकासकामे नाहीत, दुसरीकडे मनसोक्तपणे पैशांची उधळपट्टी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.शहरात महापालिकेच्या मालकीचे सुमारे ४० हजार पथदिवे आहेत. सर्व पथदिव्यांसाठी मनपाने वीज कंपनीकडून मीटर घेतले आहे. यातील बहुतांश मीटर बंद आहेत. महिन्याला जिथे १५ हजार रुपये एका मीटरचे बिल अपेक्षित आहे, तिथे वीज कंपनी अ‍ॅव्हरेज बिल आकारत आहे. दर महिन्याला १ कोटी रुपयांचा फटका मनपाला बंद मीटरमुळे बसत आहे. मनपाच्या अनेक लाईनमननी वेळोवेळी लेखी पत्र देऊन वरिष्ठांच्या निदर्शनास आणूनही दिले. वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले. शहरात महापालिकेच्या मालकीचे तब्बल पाचशेपेक्षा अधिक सामाजिक सभागृह आहेत. या सभागृहांमध्येही मनपाने विजेचे मीटर घेतले आहेत. या सभागृहांच्या माध्यमातून मनपाला एक रुपयाचेही उत्पन्न मिळत नाही. उलट सामाजिक सभागृहांच्या विजेचे बिलही मनपाच भरत आहे. पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचे एकूण वीज बिल दरमहा साडेतीन कोटी रुपये भरण्यात येते. कोट्यवधी रुपयांची ही उधळपट्टी प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.कामाचे आॅडिटच केले नाही...महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील ४० हजार पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तब्बल २२ कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांना मनपाकडून कोट्यवधी रुपये अदा करण्यात येतात. त्यांनी काम केले किंवा नाही, याचे आॅडिट कधीच होत नाही. काही राजकीय मंडळींनीही हे कंत्राट घेतले आहे. मनपा अधिकारी या कंत्राटदारांच्या फायली कुठेच थांबवीत नाहीत. मागील वर्षभराचेही मनपाने लेखापरीक्षण केल्यास कोट्यवधी रुपयांचे आर्थिक घोटाळे समोर येतील. सहा महिन्यांपूर्वी मनपा आयुक्तांनी विद्युत विभागाने किती ए-१ ची कामे केली याचा अहवाल द्यावा, असे म्हटले होते. या विभागाने आजपर्यंत अहवालच दिलेला नाही.