शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कचरा संकलनाच्या फेऱ्या कागदावरच

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे

औरंगाबाद : महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे. मनपा आणि खाजगी वाहनांच्या किती फे ऱ्या होतात. याबाबत काहीही नोंद यांत्रिकी विभागाकडे नसल्याची माहिती समोर आली आहे. वर्षाला १२ कोटी रुपयांचा खर्च खाजगी रिक्षा, ट्रॅक्टर, टिप्परच्या फेऱ्यांवर, तर पालिकेच्या टिप्पर दुरुस्तीवर १ कोटींहून अधिक खर्च होऊनही शहरात कचऱ्यांचे ढीग कायम आहेत. नोव्हेंबर २०११ पासून मनपामार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे. मनपात १,७०० च्या आसपास सफाई कर्मचारी आहेत. त्यातील अर्धे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर आहेत. रोज ५०० मेट्रिक टन कचरा उत्सर्जित होतो. पालिकेला सुमारे ४ हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे.कचऱ्याचे टिप्पर उशिरा निघत असल्यामुळे घनकचरा विभागप्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी यांत्रिकी विभागाला पत्र देऊन माहिती मागविली आहे. खाजगी टिप्पर्सची नोंद नसून पहाटे ५.३० ऐवजी ६.३० वा. टिप्पर कचरा संकलनासाठी जात आहेत. नारेगाव कचरा डेपोतील स्वच्छता निरीक्षकाकडे त्याची नोंद होते का, किती टिप्पर्सच्या किती फेऱ्या होतात. याची माहिती यांत्रिकी विभागाकडून मागविण्यात आली आहे. ४रोशनगेट परिसरात आयुक्त महाजन स्वच्छतेची पाहणी करीत असताना एक अजब माहिती समोर आली. दुभाजकावर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास आयुक्तांनी विचारले, तू इथं केव्हापासून काम करतो आहेस, त्या कर्मचाऱ्याला ते आयुक्त आहेत हे माहिती नसावे. त्याने सांगितले, मी आज बायकोच्या जागी सफाई करीत आहे. मी व माझी बायको दोघेही मनपा सेवेत असल्याचेही त्याने आयुक्तांना सांगितले.आयुक्तांना हा प्रकार कळल्यानंतर ते अवाक् झाले. त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आयुक्तांनी सफाईच्या वेळेत कर्मचारी काय करतात, हे पाहण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी सफाई कामाच्या वेळेत प्रार्थनेसाठी बाहेर गेल्याची माहिती समोर आली.