शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारात

By | Updated: November 27, 2020 04:00 IST

\S- साडेतीन कोटींची विक्री : जागतिक आरोग्य संघटना म्हणते रेमडेसिवीरचा प्रभाव दिसला नाही, तर तज्ज्ञ म्हणतात बाधितांसाठी प्रभावी ठरले ...

\S-

साडेतीन कोटींची विक्री : जागतिक आरोग्य संघटना म्हणते रेमडेसिवीरचा प्रभाव दिसला नाही, तर तज्ज्ञ म्हणतात बाधितांसाठी प्रभावी ठरले इंजेक्शन

--

औरंगाबाद : कोरोनावर प्रभावी इंजेक्शन म्हणून वापरल्या गेलेल्या रेमडेसिवीरच्या आतापर्यंत जिल्ह्यात ८१३७ कुप्प्यांची विक्री झाली. सुमारे साडेतील कोटींच्या इंजेक्शनचा वापर १३५७ बाधितांच्या उपचारात केला गेला. हे इंजेक्शन बाधितांच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचा दावा तज्ज्ञ आजही करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचे विशेष परिणाम किंवा त्यामुळे मृत्यू टाळता येतो, असेही दिसून आले नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे या इंजेक्शनच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जगात कोरोनाची माहामारी सुरू होऊन वर्ष सरले. काही देशांत दुसरी लाट सुरू झाली. भारतातही कोरोनाचा कहर पुन्हा वाढतो आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेमडेसिवीरला खूप प्रभावी मानल्या गेले. एका रुग्णाला हे सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका कुपीसाठी ५ ते १० हजारांची किंमत बाधितांच्या नातेवाईकांनी मोजली. बाधितांकडूनही रेमडेसिवीरचा हट्ट धरल्या गेला. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या खूप वाढली. त्यावेळी शहरात दररोज चारशे ते पाचशे इंजेक्शनची मागणी होती. तुटवड्याच्या परिस्थितीत अन्न औषध प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवून आवश्यक इंजेक्शनची उपलब्धता करून दिली. सध्या रुग्णसंख्या घटलेली आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत ८६३८ इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध झाले. आतापर्यंत ८१३७ इंजेक्शन वापरल्या गेले असून ४६५ शिल्लक असल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.

--

तज्ज्ञ म्हणतात रुग्णांना फायदा

---

शासनाकडून रेमडेसिवीर वापरू नका अशा सूचना नाहीत. मात्र, रेमडेसिवीर उपयोगी ठरत असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ४१५० पैकी सध्या २७०८ इंजेक्शन शिल्लक आहेत. वापरलेल्या इंजेक्शनचा रुग्णाला फायदा झाला असून इंजेक्शन दिलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. घाटीत उपलब्ध केलेल्या ४ हजारपैकी ३ हजार ४०० इंजेक्शनचा वापर झाला असून ६०० औषध भंडारात शिल्लक आहेत. घाटीत कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरले आहे, असे मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.

---