शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

जिल्ह्यातील रेशन वितरण होणार पारदर्शक

By admin | Updated: January 29, 2015 01:13 IST

गजानन वानखडे , जालना रेशन वितरण व्यवस्थेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्ह्यात दोन महिन्यांत दक्षता समित्या जाहीर होणार आहेत. या समित्यांना शासनाला दर तीन महिन्याला एक सविस्तर अहवाल पाठवावा लागेल.

गजानन वानखडे , जालनारेशन वितरण व्यवस्थेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्ह्यात दोन महिन्यांत दक्षता समित्या जाहीर होणार आहेत. या समित्यांना शासनाला दर तीन महिन्याला एक सविस्तर अहवाल पाठवावा लागेल. केवळ बैठका झाल्या हे सांगून चालणार नाही, तर बैठकीत काय चर्चा झाली याचीही माहिती द्यावी लागणार आहे. अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे रेशनवितरणात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. रेशन अर्थात सार्वजनीक व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनआवश्यक वस्तुवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ९७० गावांत ९२३ समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. शिवाय चार समित्या नगर पालिका पातळीवर, तर एक जिल्हाच्या ठिकाणी अशा ९२८ दक्षता समित्यांची नेमणूक करण्यात आली होती. समितीची दर महिन्याला बैठक न होणे, सतर्क न राहणे, कामकाज केवळ कागदोपत्रीच असणे अशा कारणांमुळे राज्यातील नव्या सरकारने या सर्व समित्या बरखास्त केल्या असून त्या नव्याने गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला २२ जानेवारीला मिळाला आहे. दक्षता समिती गठीत करण्यासाठी पालकमंत्र्यांना मंगळवारी पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. दोन महिन्यांत समित्या निवडीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. या समित्यांमुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल. या समितीत समाजसेवकांनी येणे गरजेचे असल्याचे मत माचेवाड यांनी व्यक्त केले. या समित्यांचे गठण झाल्यानंतर जिल्ह्यातील रेशन वितरणव्यवस्था सर्वसामान्यांसाठी सोयीची होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.