शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

चौकाचौकांत होते ट्रॅफिक जाम

By admin | Updated: July 26, 2016 00:20 IST

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील वाहतूक सिग्नलचे टायमिंगचे सेटिंग चुकले आहे. परिणामी जालना रोडवर चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील वाहतूक सिग्नलचे टायमिंगचे सेटिंग चुकले आहे. परिणामी जालना रोडवर चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. प्रत्येक सिग्नलवर वाहनचालकांना दोन ते तीन वेळा रेड सिग्नलचा सामना करावा लागत आहे. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे आकाशवाणी चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनचालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सध्या ८ लाख दुचाकींसह एकूण ११ लाख वाहने आहेत. यासोबतच बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांचीही यात भर पडत असते. जालना रोडवरून दर मिनिटाला साडेचारशे ते पाचशे वाहने धावत असतात. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात ३९ ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविलेले आहे. या सिग्नलमध्ये आणखी १२ सिग्नलची लवकरच भर पडणार आहे. जालना रोडवर महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते चिकलठाणादरम्यान अकरा ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आलेले आहेत. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात केलेले असता हे पोलीस वाहतुकीचे नियमन करीत असतात. वाहतूक सिग्नलची दुरुस्ती करण्याचे कामही महानगरपालिकेचे आहे. जालना रोडवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार या अकरा वाहतूक चौकांतील सिग्नलचे टायमिंग सेट करणे आवश्यक आहे. एका चौकातून दुसऱ्या चौकात जाण्यासाठी वाहनांचा सरासरी वेग गृहीत धरून प्रत्येक सिग्नलचे टायमिंग सेट करणे आवश्यक असते. तसे झाल्यास एका चौकातून दुसऱ्या चौकात जाणाऱ्या वाहनचालकास सिग्नलवर थांबण्याची गरज भासत नाही. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालते आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही. मात्र, वाहतूक सिग्नलचे टायमिंगच चुकल्याने जालना रोडवरील प्रत्येक सिग्नलवर किमान दोन ते तीन वेळा रेड सिग्नलला सामोरे जावे लागते. त्यानंतरच त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो. अमरप्रीत चौक, मोंढानाका आणि आकाशवाणी चौक सिग्नल येथे वाहनचालकांना रोज सकाळी ९ ते १ व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते.