शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 15, 2014 00:55 IST

शेवगा : जिल्ह्यात सध्या बहुरूपी समाजातील अनेक मंडळी घरोघरी जाऊन विविध सोंग करून, विशिष्ट लयीत बात बोलून नागरिकांची करमणूक करत आहे.

शेवगा : जिल्ह्यात सध्या बहुरूपी समाजातील अनेक मंडळी घरोघरी जाऊन विविध सोंग करून, विशिष्ट लयीत बात बोलून नागरिकांची करमणूक करत आहे.ग्रामीण भागात देखील आपली कला सादर करत, कसा बसा आपला उदरनिर्वाह करत आहे. उदरनिर्वाह करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.शहरात अनेक असे सोंग करून आपल्या कला दाखवीत पोट भरत आहे. शहरासह काही जणांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बहुरूप धारण करून नागरिकांची करमणूक करणे हा व्यवसाय आमचा पिढ्यान् पिढ्या चालत आल्याचे विजय सावंत, अनिल सावंत यांनी सांगितले.वयाच्या सोळाव्या वर्षांपासून बहूरूपी म्हणून गेली अनेक वर्ष नागरिकांची करमणूक करत आहे. समाजात गरिबी, अशिक्षितपणा आणि सततच्या भटकंतीने आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा प्रश्न, शासनाच्या काही योजना आम्हाला माहीत पडत नाही. अशिक्षित असल्याने काही कळतही नाही फक्त पोट भरण्यासाठी काहीतरी करावे त्यासाठी आम्ही आमचा पारंपरिक व्यवसायाप्रमाणे सतत भटकत असलेले विजय सावंत यांनी आपल्या पोलिसांची वेशभूषा करून अनेक कला सादर करून आमच्या कुंटुबाचा गाडा रेटत आहेत. वडिलांपासून हा वारसा मी चालवत आहे.बहरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ओळख आहेत.त्याकाळत अनेकजण दरबारात मनोरंजनाचे काम, वेषांतर करून खबऱ्या म्हणूनही काम करत होते. जसजसा काळ बदलत गेला तसा आमच्या कला गुणांचा हास होत चालला आहे.नवीन मूल हा व्यवसाय स्वीकारत नसल्याने ही परंपरा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. आणि आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आल्याचे सावंत यांनी सांगितले.बदलत्या काळात समाजासमोर शिक्षण आरोग्य हे महत्वाचे प्रश्न समोर आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागत असल्याने मुलाबाळांचे शिक्षण होत नाही.शिक्षण घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा पैसा देखील नाही पोट भरावे की शिक्षण घ्यावे असा गंभीर प्रश्न समाजासमोर आहे. सतत भटकंती करावी लागत असल्याने शासकीय योजनेची देखील व्यवस्थीत माहिती मिळत नाही. इंटरनेट, टी व्ही. मोबाईलमुळे आमची कलेकडे नागरिंकांचे दुर्लक्ष होत आहे. याचा मोठा परिणाम झाला आमच्या कलेवर झाला आहे. दान मिळने कठीण झाले आहे.आजही ग्रामीण भागात बाबासाहेब चौघुले, अनिल सावंत हे डॉक्टर, पोलिस, वकील यांचे सोंग करून कला सादर करत आहे.आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करत आहे.शिवाजी महाराजांच्या काळापासून बहुरुपी बहरूपी समाजाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ओळख आहेत.त्याकाळत अनेकजन दरबारात मनोरंजनाचे काम, वेषांतर करून खबऱ्या म्हणूनही काम करत होते. जसजसा काळ बदलत गेला तसा आमच्या कला गुणांचा हास होत चालला आहे. बहुरुपींना मानधन देण्याची मागणी होत आहे. शासनदरबारीही अवहेलनाच पदरी पडत आहे.