शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामपंचायतींकडे दहा कोटींची थकबाकी

By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST

हणमंत गायकवाड, लातूर या ना त्या कारणाने जिल्ह्यातल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोमात गेल्या असून, संबंधीत ग्रामपंचायतीनेही पाणीपट्टी भरली नसल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत़

हणमंत गायकवाड, लातूरया ना त्या कारणाने जिल्ह्यातल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोमात गेल्या असून, संबंधीत ग्रामपंचायतीनेही पाणीपट्टी भरली नसल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झालेल्या १४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची एकूण १०़१२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे़ त्यामुळे देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही़ जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींना नोटिसा पाठविल्या़ परंतु या नोटिसांना केराची टोपली दाखविल्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे मातेरे झाले आहे़लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील ५२ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, वळसंगी येथील ५ खेडी, मोघा येथील ११ खेडी, किनगाव-हंगेवाडी येथील ६ खेडी, किनगाव-देवखरा येथील ६ खेडी, किनगाव-सोनखेड ६ खेडी, अंधेरी-दामपूरी ४ खेडी, ३० खेडी किल्लारी, ६ खेडी चाकूर, १७ खेडी आटोळा, २० खेडी उटी खुर्द, ६ खेडी मुरुड, ५ खेडी बिटरगाव आणि ९ खेडी शिवपूर योजनेअंतर्गत १३५ गावांना कायमस्वरुपी पाणीपुरवठ्याची सोय आहे़ परंतु या योजनेवरील पाणीपट्टी जमा होऊ शकली नाही़ त्यामुळे देखभाल दुरुस्ती झाली नाही़ या योजनेअंतर्गत असलेल्या १३५ ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाने पाणीपट्टी भरण्याचे निर्देश दिले़ शिवाय नोटिसाही पाठविल्या़ परंतु संबंधीत सरपंचांनी या नोटिसांना केराची टोपली दाखविली़ त्यामुळे या योजना बंद पडल्या आहेत़ केवळ देखभाल दुरुस्तीला पैसा नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या योजना मातीमोल झाल्या आहेत़ या योजनेअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांची तत्कालीन जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी बैठक घेतली़ आपल्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची पाणीपट्टी भरा, आपण देखभाल दुरुस्ती करु, असे सुचविले़ परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे योजना कोमात गेल्या आहेत़ जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या सर्कलमधील सर्कलमधील सरपंचांची बैठक घेतली़ ग्रामसेवकांच्या मदतीने पाणीपट्टी वसूल करुन ती जमा केल्यानंतर त्या पाणीपट्टीतून योजनांची दुरुस्ती करता येईल, असे सुचविले़ परंतु सरपंचांनी या सुचनेकडे कानाडोळा केला़ त्यामुळे या योजना बंदच आहेत़ आता या १३५ गावांत पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे़ जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झालेल्या अहमदपूर ५२ खेडी योजनेत ३२़८१ लाख, वळसंगी ५ खेडी योजनेत २८़१३ लाख, मोघा ११ खेडी योजनेत ११़७४ लाख, हंगेवाडी ५ खेडी योजनेत २़२७ लाख, देवकरा ६ खेडी योजनेत ३़२६ लाख, सोनखेड ६ खेडी योजनेत २़४ लाख, अंधोरी ४ खेडी योजनेत १़८० लाख, किल्लारी ३० खेडी योजनेत ५९़७२ लाख, चाकूर ६ खेडी योजनेत ८़१५ लाख, आटोळा १७ खेडी योजनेत ८़९४ लाख, उटी खुर्द २० खेडी योजनेत ४़६८ लाख, मुरुड ६ खेडी योजनेत २४़७७ लाख, बिटरगाव ५ खेडी योजनेत ५़२० लाख, शिवपूर ९ खेडी योजनेत १३़८७ लाख पाणीपट्टीची थकबाकी आहे़ या थकबाकीतून पाणी जिल्हा परिषदेच्या फंडातून देखभाल दुरुस्ती होऊ शकते़ परंतु ग्रामस्थ व सरपंचांचा प्रतिसाद मिळत नसल्याने योजना असून नसल्यासारख्या आहेत़हस्तांतरीत झालेल्या १४ व हस्तांतरणाविना रखडलेल्या १२ योजनांची दुरुस्ती झाली असती तर २०६ गावांचा पाणीप्रश्न मिटला असता.