शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

हजार शाळा संरक्षण भिंतीविना !

By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST

संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली

संजय कुलकर्णी, जालनाजिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या सरकारी शाळांच्या जागा अतिक्रमणांनी व्यापू लागल्या आहेत. तर काही शाळांच्या जागेचा वापर खाजगी साहित्य टाकण्यासाठी होऊ लागला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन कार्यावर त्याचा विपरित होतो आहे.दरम्यान, ग्रामीण भागात काही ठिकाणी या प्रकारामुळेच शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांचे या अतिक्रमणकर्त्यांबरोबर वाद-विवादाचेही प्रसंग घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५१४ शाळा आहेत. यात १४८२ प्राथमिक तर ३२ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांनी ठिक ठिकाणी मोठ्या जागा मिळाल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागात शाळांचा आवार मोठा आहे. ग्रामपंचायतींनी मोठ्या उदात्त हेतून तसेच भविष्यातील विस्तार ओळखून शाळांकरिता जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र काही शाळांची इमारती मर्यादित जागेवर उभ्या आहेत.त्यामुळे त्या त्या ठिकाणी शाळांच्या विस्तारीकरणात मोठ मोठे अडथळे उदभवू लागले आहेत. विशेषत: वर्ग खोल्यांचा प्रश्न भेडसावतोय आहे. त्यातच आता शाळेभोवती संरक्षक भिंतीच नसल्यामुळे काही शाळांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. मोकळ्या जागेचा वापर कडबा टाकणे, जनावरे बांधणे, शेतीचा माल टाकणे इत्यादी कामांसाठी होत आहे. शाळेची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुतांश शाळा मुख्य रस्त्यावर आहेत. यामुळे धोका आहे.पक्क्या पण तुटलेल्या आवार भिंतीपक्क्या पण तुटलेल्या आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ५६ एवढी आहे. यापैकी बऱ्याच शाळांच्या संरक्षण भिंतींच्या दुरूस्तीचे काम या ना त्या कारणाने रेंगाळले. तुटलेल्या संरक्षण भिंतींमुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे. दुरूस्तीच्या कामांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे देण्यात आल्याचे काही मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते. तारेचा कुंपणाचा आधार१२२ शाळांना तारेचे कुंपण करून शाळेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तारेचे कुंपणही अनेक ठिकाणी निघालेले आहे. त्यामुळे जनावरे तेथे जात आहेत. अशा शाळांच्या ठिकाणी नव्याने संरक्षण भिंतीचे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शाळांना झाडांचे कुंपण२६८ शाळांना झाडांचे कुंपण करण्यात आले आहे. अशा शाळांमधील शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळेच्या जागेभोवती झाडे लावून संरक्षण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अशा ठिकाणची काही झाडेही उन्मळून पडलेली आहेत. आवार भिंत नसलेल्या शाळाआवार भिंती नसलेल्या शाळांची संख्या ६३९ एवढी आहे. यापैकी काही शाळा वर्दळीच्या रस्त्यांवर आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी पळत सुटतात, त्यामुळे अशा शाळांभोवती आवार भिंतीची गरज आहेअ. अर्धवट आवार भिंतीअर्धवट आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ९६ एवढी आहे. अशा शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू झाले होते. मात्र ते काही कारणाने बंद पडले. काही शाळांचे अर्धवट काम नंतर वर्षानुवर्षे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे अशा शाळांभोवतीच्या आवार भिंतीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. केवळ २ शाळांचे काम सुरूजिल्ह्यात केवळ २ शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीची कामे ज्याप्रमाणे हाती घेण्यात आली, त्याप्रमाणे शाळांच्या आवार भिंतीची कामेही करावीत, अशी अपेक्षा ग्रामीण भागात पालकांमधूनही व्यक्त केली जात आहे.निधीची गरजजिल्ह्यात पक्की आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ३२९ एवढी आहे. एकूण शाळांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. ज्या ठिकाणी पक्क्या आवार भिंती आहेत, तेथील शाळांची रंगरंगोटीही बऱ्यापैकी झालेली आहे. यापैकी बहुतांश शाळांना प्रवेशद्वार असून ते शाळेच्या वेळेतच उघडे असते. याबाबत जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती वर्षाताई देशमुख म्हणाल्या की, १००९ शाळांना संरक्षण भिंती नाहीत. या शाळांच्या संरक्षण भिंतीच्या कामांसाठी ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे हे एकाचवेळी होणारे काम नाही. मात्र नाविन्यपूर्ण योजनेतून या कामासाठी निधी गरजेचा आहे