शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

तांड्यावरील ७० टक्के कुटुंबांचा पाचटाशी लढा!

By admin | Updated: November 25, 2014 00:59 IST

राजू दुतोंडे , सोयगाव उसाचा फड तर पाचविलाच पुजलेला. सहा महिने पाचटाशी लढा दिला नाही तर वर्षभर खाण्याचा प्रश्न. त्यामुळे उसतोड केल्याशिवाय पर्याय नसतो.

राजू दुतोंडे , सोयगावउसाचा फड तर पाचविलाच पुजलेला. सहा महिने पाचटाशी लढा दिला नाही तर वर्षभर खाण्याचा प्रश्न. त्यामुळे उसतोड केल्याशिवाय पर्याय नसतो. तांड्यावरून ३० टक्के कुटुंब उचल घेऊन उसतोडीसाठी दरवर्षी स्थलांतरीत व्हायचे. पण, यंदाची दाहकता निराळीच आहे. हाताला काम नाही. नाही म्हणण्यापेक्षा मागितले तरी काम मिळणारच नाही, म्हणून तब्बल ७० टक्के गाव रिकामे झाले आहे. तांड्यावरून कुटुंबच्याकुटुंब उसतोडीला जाण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे तांड्यांचे जणू गावपणच हरपले आहे. यंदा खरीप हंगाम पूर्णपणे हातून गेल्यामुळे उसतोडीला जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक तांड्यातील ७० टक्के पुरुष-महिला मुलाबाळांसह ऊसाच्या फडात गेल्यामुळे तांडे ओस पडले आहेत. गुरेढोरे सांभाळण्यासाठी केवळ वयोवृद्ध मंडळी गावात दिसत आहेत.साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले की, ऊसतोड मजुरांची फडावर जाण्याची घाई सुरू होते. सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा, फर्दापूर तांडा, वरखेडी तांडा, निंबायती तांडा, न्हावी तांडा, रामपुरा तांडा, बहुलखेडा, नांदा तांडा, देव्हारी, टिटवी, घाणेगाव तांडा, चारूतांडा, हनुमंतखेडा, उप्पलखेडा, बनोटी तांडा, मोहळाई, नांदगाव तांडा, बोरमाळ तांडा आदी गावांतून ऊसतोड मजूर दरवर्षी ऊसतोडीला जातात. तसे यंदाही गेले. मात्र, त्यांची संख्या यावर्षी जवळपास दुप्पट वाढली आहे. खरीप उरकवून शेतकरी मजुरी मिळावी यासाठी ऊसतोडीला जातात. प्रत्येक तांड्यातून शेकडो जोडपे आपल्या मुला-बाळांसह घरदार सोडून स्थलांतरित होतात. गावातील मुकादमाकडून उचल घेऊन खरीप हंगामाची पेरणी मशागत करायची आणि घेतलेले पैसे फेडण्यासाठी ऊसतोडीला जायचे, अशी जणू परंपराच प्रत्येक तांड्यावर रुजलेली आहे.१जंगला तांडा गावची लोकसंख्या अंदाजे २२०० इतकी आहे. यातील जोडपे व मुले पकडून जवळपास दीड हजार लोक आजघडीला फडात पाचरटासोबत दिवसरात्र झुंजत आहेत. फैसपूर, गंगामाई, बारामती, दौंड आदी कारखान्यांवर हे मजूर गेलेले आहेत. गावात केवळ मोठे बागायतदार शेतकरी काही शाळकरी मुले-मुली आणि गुरेढोरे सांभाळण्यासाठी वयोवृद्ध मंडळी शिल्लक आहे. दुपारी तर ओस पडल्यासारखी स्थिती बंजारा तांड्यावर दिसत आहे.