शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

तांड्यावरील ७० टक्के कुटुंबांचा पाचटाशी लढा!

By admin | Updated: November 25, 2014 00:59 IST

राजू दुतोंडे , सोयगाव उसाचा फड तर पाचविलाच पुजलेला. सहा महिने पाचटाशी लढा दिला नाही तर वर्षभर खाण्याचा प्रश्न. त्यामुळे उसतोड केल्याशिवाय पर्याय नसतो.

राजू दुतोंडे , सोयगावउसाचा फड तर पाचविलाच पुजलेला. सहा महिने पाचटाशी लढा दिला नाही तर वर्षभर खाण्याचा प्रश्न. त्यामुळे उसतोड केल्याशिवाय पर्याय नसतो. तांड्यावरून ३० टक्के कुटुंब उचल घेऊन उसतोडीसाठी दरवर्षी स्थलांतरीत व्हायचे. पण, यंदाची दाहकता निराळीच आहे. हाताला काम नाही. नाही म्हणण्यापेक्षा मागितले तरी काम मिळणारच नाही, म्हणून तब्बल ७० टक्के गाव रिकामे झाले आहे. तांड्यावरून कुटुंबच्याकुटुंब उसतोडीला जाण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे तांड्यांचे जणू गावपणच हरपले आहे. यंदा खरीप हंगाम पूर्णपणे हातून गेल्यामुळे उसतोडीला जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक तांड्यातील ७० टक्के पुरुष-महिला मुलाबाळांसह ऊसाच्या फडात गेल्यामुळे तांडे ओस पडले आहेत. गुरेढोरे सांभाळण्यासाठी केवळ वयोवृद्ध मंडळी गावात दिसत आहेत.साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले की, ऊसतोड मजुरांची फडावर जाण्याची घाई सुरू होते. सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा, फर्दापूर तांडा, वरखेडी तांडा, निंबायती तांडा, न्हावी तांडा, रामपुरा तांडा, बहुलखेडा, नांदा तांडा, देव्हारी, टिटवी, घाणेगाव तांडा, चारूतांडा, हनुमंतखेडा, उप्पलखेडा, बनोटी तांडा, मोहळाई, नांदगाव तांडा, बोरमाळ तांडा आदी गावांतून ऊसतोड मजूर दरवर्षी ऊसतोडीला जातात. तसे यंदाही गेले. मात्र, त्यांची संख्या यावर्षी जवळपास दुप्पट वाढली आहे. खरीप उरकवून शेतकरी मजुरी मिळावी यासाठी ऊसतोडीला जातात. प्रत्येक तांड्यातून शेकडो जोडपे आपल्या मुला-बाळांसह घरदार सोडून स्थलांतरित होतात. गावातील मुकादमाकडून उचल घेऊन खरीप हंगामाची पेरणी मशागत करायची आणि घेतलेले पैसे फेडण्यासाठी ऊसतोडीला जायचे, अशी जणू परंपराच प्रत्येक तांड्यावर रुजलेली आहे.१जंगला तांडा गावची लोकसंख्या अंदाजे २२०० इतकी आहे. यातील जोडपे व मुले पकडून जवळपास दीड हजार लोक आजघडीला फडात पाचरटासोबत दिवसरात्र झुंजत आहेत. फैसपूर, गंगामाई, बारामती, दौंड आदी कारखान्यांवर हे मजूर गेलेले आहेत. गावात केवळ मोठे बागायतदार शेतकरी काही शाळकरी मुले-मुली आणि गुरेढोरे सांभाळण्यासाठी वयोवृद्ध मंडळी शिल्लक आहे. दुपारी तर ओस पडल्यासारखी स्थिती बंजारा तांड्यावर दिसत आहे.