शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

फडणवीसांच्या निवडीने जालनेकरांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: October 30, 2014 00:26 IST

जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर जालना जिल्ह्यासह शहरात मंगळवारी

जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर जालना जिल्ह्यासह शहरात मंगळवारी व बुधवारी फटाक्यांची आतीषबाजी करून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी पेढ ेवाटप केले. फडणवीस यांच्या निवडीचे वृत्त जाहीर होताच मंगळवारी सायंकाळी येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे जुना जालन्यातील शनिमंदिर, गांधीचमन, नवीन जालन्यातील बडीसडक, सराफा या भागातही फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा आदी ठिकाणीही कार्यकर्त्यांनी या निवडीचे जोरदार स्वागत केले. ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यासह काही प्रमुख मंडळींचा मंत्रिपदी शपथविधी होणार असल्याने या दिवशीही मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शहर सरचिटणीस रवींद्र देशपांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आगामी काळात विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात नंबर वन होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.४विलास नाईक (माजी उपनगराध्यक्ष) - फडणवीस यांचे व्यक्तीमत्व आदर्शवादी आहे. २७ व्या वर्षीच त्यांनी महापौरपदाचा कार्यभार सांभाळला. उत्कृष्ट वक्ता, जनसामान्यांच्या प्रश्नांचा अभ्यास असल्याने त्यांनी राज्यात नवचैतन्य निर्माण केलेले आहे.४किशोर अग्रवाल (जिल्हा सरचिटणीस) - फडणवीस यांच्या निवडीमुळे राज्याला युवा व स्वच्छ प्रतिमा असलेले कल्पक नेतृत्व मिळाले आहे. आगामी काळात महाराष्ट्र निश्चितच विकासाच्या यशोशिखरावर पोहोचेल, यात शंका नाही. ४देवीदास देशमुख (जिल्हा सरचिटणीस) - देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत जाणार आहे. प्रगतीच्या आलेखबाबत देशात महाराष्ट्राला ते नंबर वन बनवतील, हे निश्चित.४रवींद्र देशपांडे (शहर सरचिटणीस) - देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीमुळे तरूणांचा उत्साह वाढला आहे. ते देशात महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत नंबर वन बनवतील, यात कसलीशही शंका नाही.