शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

परीक्षणाला ‘खो’

By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST

राजेश खराडे , बीड जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादनक्षमता वाढविता येऊ शकते. मात्र, जिल्ह्यात माती व पाणी परीक्षणाला शेतकऱ्यांसह कृषी विभागाने ‘खो’ दिला आहे.

राजेश खराडे , बीडजमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादनक्षमता वाढविता येऊ शकते. मात्र, जिल्ह्यात माती व पाणी परीक्षणाला शेतकऱ्यांसह कृषी विभागाने ‘खो’ दिला आहे. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. ७ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ४ ते ५ हजार शेतकरी हे वर्षाकाठी माती व पाणी परीक्षण करतात, असा धक्कादायक निष्कर्ष ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून सोमवारी पुढे आला.माती परिक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी- जास्त प्रमाण लक्षात आल्यावर येथील कार्यालयातून नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस व उत्पादनात वाढ करण्यासाठी हे परिक्षण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपारिक शेतीपद्धतीवरच भर देत आहे. केवळ ठिबकसिंचनाचे अनुदान मिळण्याकरिता माती परिक्षण हे बंधनकारक आहे. त्यामुळे परिक्षण केवळ नावाला राहिले असून याचा फायदा ठिबकसिंचनाचे विक्रेतेच करून घेत आहेत. सध्या दुष्काळाची दाहकता अधिक प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ सेंद्रीय शेतीपद्धतीचा पर्याय उरत आहे. सेंद्रीय पद्धतीने जलसंधारण क्षमता वाढविण्यास मदत होत आहे. पिकांचे अवषेश किंवा शेणखताचा वापर केल्यास दुष्काळी परिस्थितीमध्येही भरघोस उत्पादन मिळते. फक्त सेंद्रीय शेतीकडे शेतकरी गांभीर्याने बघण्याची गरज आहे असे व्यवस्थापक डी.एम.काकडे यांनी सांगितले. रासायनिक खताचा वापर केल्याने पाणी अधिक प्रमाणात लागते. दुष्काळी परिस्थितीमध्ये याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील किती शेतकरी मातीचे परीक्षण करून पिकाची लागवड करतात याविषयी ‘लोकमत’ने सोमवारी सर्वेक्षण केले. यामध्ये परीक्षणाचा उपयोग केला जातो का ? असे विचारले असता केवळ १ टक्का लोकांनी उपयोग करीत असल्याचे सांगितले. यामध्ये कृषी अधिकाऱ्याकडून परीक्षणाविषयी माहिती दिली जाते का ? असे विचारल्यावर केवळ चार टक्के शेतकऱ्यांनी माहिती देत असल्याचे सांगितले. सेंद्रीय शेती करणारे जिल्ह्यात केवळ चार टक्केच शेतकरी आहेत तर एकूण शेतकरी संख्येच्या तुलनेत ०.६८ टक्के शेतकरीच शेतीचे परीक्षण करीत असल्याचे उघडकीस आले.