शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

तीन महिन्यात डेंग्यूसदृश तापाचे १० बळी

By admin | Updated: November 3, 2014 00:38 IST

जालना : गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत या तापाने १० बळी घेतले आहेत

जालना : गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत या तापाने १० बळी घेतले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूने एकाही रुग्णाचा बळी गेला नसल्याचा दावा केला आहे. याउलट ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ठावठिकाणा राहत नाही, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेतही डेंग्यूचा विषय गाजला. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून विविध गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पाहिजे तशी दखल घेतली नाही. किंबहुना या साथरोगाला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने सांघिकरित्या काहीच केले नाही. पंचायत विभागामार्फत त्या-त्या गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत. ग्रामपंचायतींनी एकदा धूरफवारणी केली. परंतु पुढे ती झाली नाही.भोकरदन तालुक्यातील पद्मावती, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे अनुक्रमे दोन व तीन जणांचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. परतूर शहर,जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा मृत्यू झाला. नळणी, कोदोली, वालसावंगी, लेहा, बठाण इत्यादी ठिकाणीही डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले. अन्य काही ठिकाणीही तापाच्या आजाराने ५ रुग्णांचा मृत्यू झाला.अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डासअळी आढळून आली. घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. रुग्णांमध्ये विशेषत: बालकांमध्ये शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी होण्याचे प्रकार आढळून आले. गावात डॉक्टर नसल्याने तापाने फणफणलेल्या काहींनी आजार अंगावरच काढला. त्याचा परिणाम म्हणून या रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना शहरी भागात नेऊन तेथील रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले, असे काही ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)