शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

इंधनात इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारातच; जुन्या पद्धतीनेच होते पेट्रोलपंपांची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:19 IST

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे दर सर्वत्र सारखेच असल्यामुळे मापात पाप होत आहे काय, इंधनाची घनता कशी आहे, त्यात पाण्याची भेसळ आहे की नाही. फिल्टर केल्यानंतर इंधनाची गुणवत्ता कशी आहे.एवढ्याच मुद्यांचे पुरवठा विभाग जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करीत आहे. 

औरंगाबाद : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची कुठलीही तांत्रिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाला कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची तांत्रिक माहिती अंधारात आहे. जुन्या पद्धतीनेच इंधनाचे माप, घनता, पाणी, फिल्टर आणि दर तपासण्यात येत आहेत. दर सर्वत्र सारखेच असल्यामुळे मापात पाप होत आहे काय, इंधनाची घनता कशी आहे, त्यात पाण्याची भेसळ आहे की नाही. फिल्टर केल्यानंतर इंधनाची गुणवत्ता कशी आहे. एवढ्याच मुद्यांचे पुरवठा विभाग जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षण करून त्याचा अहवाल तयार करीत आहे. 

शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर त्यामध्ये पाणी निघण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहने बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पेट्रोलपंपचालकांनी देखील हात टेकल्याचे वक्तव्य करून कंपन्यांकडे बोट दाखविले. गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने अचानक ६ पंप तपासले. त्यापैकी एकाही पंपामध्ये भेसळ आढळून आलेली नाही. तसेच कुठेही इंधनात पाणी आढळून आले नाही. 

टाक्या रोटेशननुसार स्वच्छ करतात इंधनासाठी वापरण्यात येणार्‍या टाक्या स्वच्छ करण्यासाठी त्याचे रोटेशन कंपनी प्रतिनिधी, वजनमापे विभाग, उपसा मशीन पुरवठा कंपनी प्रतिनिधी व मालकाच्या उपस्थितीत करावे लागते.  रोटेशन ठरलेले असते. त्यातही डेडस्टॉक  हा उपसल्या जात नाही. १० ते १२ वर्षांपूर्वी डेडस्टॉक विक्रीसाठी पुरवठा विभागाची परवानगी घेतली जायची. सद्य: पेट्रोलपंपांची संख्या वाढल्यामुळे परवानगी घेतली जात नाही. 

पुरवठा अधिकार्‍यांचे मत असे -पुरवठा अधिकारी डॉ.भारत कदम म्हणाले, पुरवठा विभागाला  इंधनाचे माप, घनता, पाणी, फि ल्टर आणि दर तपासण्याचे अधिकार आहेत. इथेनॉल मिश्रण हे तांत्रिक बाब आहे. त्याच्या मिश्रणाबाबत पुरवठा विभागापर्यंत काहीही माहिती आलेली नाही. शिवाय हा केंद्र शासनाचा निर्णय आहे. 

पेट्रोल कंपन्यांचे मुख्यालय तिकडेच असून, सेल्स आॅफिसरदेखील कंपनी मुख्यालयाच्या संपर्कात असतात. शहरी भागातच पेट्रोलमध्ये पाणी मिश्रण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ग्रामीण भागातून आजवर एकही तक्रार आली नसल्याचा दावा कदम यांनी केला.

इथेनॉलचे पाणी होत असेल, तर सर्व पेट्रोलपंपांबाबत तक्रारी आल्या पाहिजेत. ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. किमान दोन लिटर पेट्रोल घेऊन त्यांची पावती ग्राहकांनी घ्यावी. त्यानंतर जर वाहनातील इंधनात पाणी निघाले तर तक्रार करून संबंधित पंपचालकावर गुन्हा दाखल करता येईल.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपAurangabadऔरंगाबाद