औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी द्याव्या लागणाऱ्या संगणकीय चाचणी प्रणालीत मंगळवारी तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामुळे शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी शहर आणि परिसरातून आलेल्या वाहनधारकांना माघारी फिरावे लागले. दिवसभरात जवळपास तीनशेपेक्षा अधिक वाहनधारक चाचणीविना परतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मुलांना नवीन वाहन घेऊन देण्यावर भर दिसून येतो. त्यामुळे नवीन वाहन घेतल्यावर बहुतांश जणांना शिकाऊ परवाना काढावा लागत आहे. शिवाय वाहतूक पोलिसांकडूनही कारवाई केली जात असल्याने विना लायसन्स वाहन चालविण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन लर्निंग लायसन्स काढण्याचे प्रमाण वाढत आहे. आरटीओ कार्यालयात दररोज लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसून येते. लर्निंग लायसन्ससाठी वाहनधारकांना संगणकीय चाचणी द्यावी लागते; परंतु मंगळवारी ही संगणकीय चाचणी यंत्रणा बंद पडली. त्यामुळे दिवसभर ही यंत्रणा बंद राहिल्याने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आलेल्या अनेकांना माघारी फिरावे लागले.गतिमान करण्याचा प्रयत्नअनेकदा वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी वाहनधारकांना जवळपास चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनधारकांना दोन तासांत लायसन्स मिळेल, यासाठी सध्याच्या लर्निंग लायसन्स वितरणप्रणालीत आवश्यक ते बदल करून गतिमान करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
लर्निंग लायसन्स यंत्रणेत तांत्रिक बिघाड
By admin | Updated: August 6, 2014 02:36 IST