शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न व्हावेत-टोपे यांचे प्रतिपादन

By admin | Updated: July 3, 2014 00:20 IST

जालना : पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जालना : पाणी हा नैसर्गिक स्त्रोत्र आहे. पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यात यावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषदेत आयोजित जिल्हा पाणी गुणवत्ता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.पाणी गुणवत्ता सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषद झालेल्या पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा भुतेकर, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्याकर केंद्रे, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ.डी.डी.भगत, ग्रामीण पाणीपुरवठ विभागाचे तांगडे, पंडित भुतेकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.दूषित पाणी पुरठ्यामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होऊ नये यासाठी संबंधित विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. दूषित पाण्यासंदर्भात जिल्ह्यात निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, त्यावर आणखी काम करणे अत्यावश्यक आहे.पाणी गुणवत्तेबरोबरच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न होणे गरजचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)प्रयोगशाळांची गरजजिल्हा प्रयोगशाळेसह तालुका निहाय छोट्या गावांतही पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात दूषित पाणी तपासणी करण्यासाठी प्रयोग शाळा नसल्याने दूषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मितीची मागणी होत आहे.