शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

३३ गावांसह अकरा वाड्यांना टँकरचा आधार

By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST

अरूण देशमुख, भूम तालुक्यात पावसाळ्याही ९३ गावांपैकी ३३ गावांसह ११ वाड्यात ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही असे चित्र सध्या दिसत आहे.

अरूण देशमुख, भूमतालुक्यात पावसाळ्याही ९३ गावांपैकी ३३ गावांसह ११ वाड्यात ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या आणखी वाढवावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.तालुक्यात गतवर्षीचा झालेला अल्प पाऊस तर यंदा अद्यापही पाऊस नसल्यामुळे विहिरी, बोअर अखेरची घटका मोजत आहेत. यामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत वालवड, अंबी, पाथरुड सर्कलमध्ये सर्वाधिक टंचाई जाणवत असून, विहीर, बोअर, तलाव, हातपंपाची पाणीपातळी दिवसागणिक घटत असल्याने टंचाई वाढत आहे. वालवड गावाला पाणीपुरवठा करणारा हिवर्डा तलाव कोरडाठाक असून, या तलावात दर १५ दिवसाला पाण्यासाठी नवीन ठिकाणी खड्डा घेऊन वालवडला पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात ९३ गावापैकी ३३ गावे व ११ वाड्या तहानलेल्या असून, टँकरसाठी दिवस-दिवस प्रतीक्षा केली जात आहे. पावसाळा सुरु होवून मृग कोरडा गेला. आर्द्रा सुरु झाल्या तरी पावसाचा पत्ता नसल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, तालुक्यातील निपाणी येथील ग्रामस्थांनी टंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला आहे. ‘जीपीआरएस’ नावालाचतालुक्यात खाजगी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील गैरप्रकारास आळा बसावा, यासाठी प्रशासनाने जीपीआरएस ही यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची आॅनलाईन माहिती तहसील कार्यालयास उपलब्ध होते. तालुक्यातील खाजगी टँकर्सना अशी यंत्रणा बसविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी येथील तहसील कार्यालयात मात्र अशी कुठलीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसते. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांना विचारले असता खाजगी टँकर्सना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, या कामाचे कंत्राट घेतलेल्या संबंधित यंत्रणेने अद्याप ती कार्यान्वित केलेली नसल्याचे सांगितले.तालुक्यात एकूण ९३ गावांपैकी ३३ गावे, ११ वाड्यात पाणीटंचाई असून, एकूण ३३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यामध्ये ११ शासकीय तर २२ खाजगी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ३६ विहीर व २१ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.सभापतींना साकडेतालुक्यातील इराचीवाडी व बागलवाडी येथील परिसरामधील विहीर, बोअर हे पाण्याअभावी अखरेची घटका मोजत असून, यामुळे या परिसरामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पूर्वी केलेल अधिग्रहण, बोअर, विहिरीची पाणीपातळी घटल्याने आता नव्याने पाण्याचा शोध घेवून अधिग्रहण करण्याची वेळ आली आहे. याच अनुषंगाने इराचीवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी पं. स. सभापती अण्णा भोगील यांची भेट घेवून पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.