शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

शहरात टाहो, रस्त्यावर धो-धो

By admin | Updated: June 8, 2014 01:15 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबादशहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे. पैठणपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यातून हे पाणी अहोरात्र बाहेर पडत आहे. जायकवाडी धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापैकी दररोज तब्बल ४० दशलक्ष लिटर म्हणजे एक चतुर्थांश पाणी गळतीमुळे रस्त्यातच वाया जात आहे.औरंगाबाद शहरात महिनाभरापासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक भागांत चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मनपाच्या ७०० मि. मी. आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्यांना ३० पेक्षा जास्त ठिकाणी गळती लागली आहे.भर उन्हात रस्त्याशेजारी डोहमनपाच्या दोन्ही जलवाहिन्या पैठण रोडच्या बाजूने गेलेल्या आहेत. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे या रस्त्याशेजारी अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोठमोठे डोह साचले आहेत. काही ठिकाणी हे पाणी रस्त्याच्या बाजूने वाहताना दिसत आहे. जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधूनही पाण्याचे मोठमोठे फवारे बाहेर पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून ही गळती सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मात्र, मनपा प्रशासनाने तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही या गळत्या थांबविलेल्या नाहीत. शहराजवळील महानुभाव आश्रमापासून ते पैठण शहरापर्यंत रस्त्यालगत ठिकठिकाणी जलवाहिनीतून पाणी गळती लागली आहे. कांचनवाडी, वाल्मी, गेवराई तांडा, अलाना कंपनी, चित्तेगाव, बिडकीन, ढोरकीन आदी ठिकाणी ही गळती सुरू आहे.मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातून सध्या दररोज १५० ते १५५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. मात्र यापैकी १२५ दशलक्ष लिटर पाणीच शहरापर्यंत पोहोचते. उर्वरित ३० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिनीच्या गळतीमुळे वाटेतच वाया जाते. ही गळती इथेच थांबत नाही तर शहरातही अंतर्गत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे आणखी १० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दररोज केवळ ११५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते.