शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

ग्रामीण भागात स्वाईन फ्लूची धास्ती; जनजागृतीची गरज

By admin | Updated: March 5, 2015 00:00 IST

राजूर : दिवसेंदिवस राज्यात स्वाईन फ्लूचा ज्वर वाढत असल्याने ग्रामीण भागात जनतेत धास्ती पसरली आहे. राजूर परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने

राजूर : दिवसेंदिवस राज्यात स्वाईन फ्लूचा ज्वर वाढत असल्याने ग्रामीण भागात जनतेत धास्ती पसरली आहे. राजूर परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. बदलत्या वातावरणाचा जनतेच्या आरोग्यावर परिणाम झाला असून सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढल्याने अनभिज्ञ नागरिकांत स्वाईन फ्लूची धास्ती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासह जनजागृती करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे अचानक वातावरणात बदल झाल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामध्ये सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण अधिक आहेत. गेल्या चार महिन्यापूर्वी चांधई ठोंबरीत डेंग्यूच्या आजाराने एका बालकाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे साथीच्या आजाराबाबत नागरिकांत भीती आहे.आरोग्य विभागाने ग्रामीण भागात स्वाईन फ्लूच्या आजाराविषयी जनजागृती करण्याची मागणी होत आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ग्रामीण भागातील शाळा, विद्यालयासह गावपातळीवर लस देण्याची मागणी होत आहे. अगोदरच शेतकऱ्यासंह सर्वसामान्य जनता दुष्काळामुळे आर्थिक समस्येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मोहिते यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी राजूर परिसरात स्वाईन फ्लू नसल्याचे सांगितले.मात्र नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. स्वच्छ पाणी व साबणाने हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे, खोकतांना व शिंकतांना तोेंडाला रूमाल बांधणे, भरपूर पाणी पिण्यासह झोप घेण्याचा सल्ला दिला. (वार्ताहर)