लातूर : अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने वर्षभर राबविल्या जाणाऱ्या ‘संस्कार स्वच्छतेचा’ या अभियानाचा प्रारंभ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी स्वच्छतेच्या सामुहिक शपथेने करण्यात आला. यावेळी शहरातील १६ स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित शपथ घेऊन वर्षभर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अभियानाचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी डॉ. ईश्वर राठोड होते. यावेळी खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, महापौर अख्तर शेख, अनिल महाजन, संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळ, शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी दक्ष लातूरचा संकल्प केला. यावेळी जवळपास ३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी छात्र शक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, उपमहापौर कैलास कांबळे, नगरसेवक रवि सुडे, राजा मणियार, अभियानाचे संयोजक निलेश ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
स्वच्छतेची लातूरकरांनी घेतली शपथ..
By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST