शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST

औरंगाबाद : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता कृती आराखडा ...

औरंगाबाद : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता कृती आराखडा तयार करून १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे पत्र पर्यावरण मंत्रालयाने मनपा आयुक्त यांना दिले आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी देशातील १२२ शहरांमध्ये महत्त्वाकांक्षी व कालबध्द कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे नियंत्रण केले जात आहे. देशातील १२२ शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारणे हा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये २०२५ पर्यंत हवेतील प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत आणणे, २५ टक्क्यांपर्यंत हवेतील गुणवत्ता सुधारणे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उघड्यावर कोळसा, प्लास्टिक, रबर व उर्वरित कचरा जाळण्यास बंदी घालणे, घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम करणे, घराघरातील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणे, प्लास्टिकची विल्हेवाट लावणे, उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, रस्त्यावरील धुळीचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने यांत्रिकीकृत रस्त्याची सफाई, रस्त्यावरील धूळ नष्ट करण्यासाठी स्प्रिंक्लरच्या सहाय्याने पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्यातील १८ मनपा व नगरपालिकांची या योजनेकरिता निवड करण्यात आली असून मनपासोबत सामंजस्य करार केला आहे. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून २०२०-२०२५ या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करून १५ फेब्रुवारीपर्यंत संचालनालयास सादर करावा, असे पत्र मनपा आयुक्तांना कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे यांनी पाठविले आहे.