शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त; केंद्रावर गोंधळ

By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST

औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमासाठी रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर विहित

 औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमासाठी रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर विहित ओळखपत्र नसल्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी प्रथमच बी. एड. प्रवेश परीक्षा लेखी स्वरुपात न घेता आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. एकूण सात केंद्रांवर ही परीक्षा तीन सत्रांत पार पडली. या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात मौलाना आझाद महाविद्यालयातील केंद्रावर आलेल्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना ओळखपत्राच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र म्हणून इंटरनेटवरून आधार कार्डची प्रत आणली होती; परंतु ओळखपत्रासाठी ही प्रत नाकारण्यात आली. आधार कार्ड हवे, असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याशिवाय काहींनी अर्ज करताना लग्नानंतरचे नाव नमूद केले. त्यामुळे अशांना विवाहाचे प्रमाणपत्र, शपथपत्राशिवाय परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यामुळेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने शिक्षक होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेल्याने तीव्र संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. याविषयी उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर म्हणाले, ओळखपत्राविषयी परीक्षार्थींना संपूर्ण क ल्पना देण्यात आली होती. त्यामुळे योग्य ओळखपत्राची पूर्तता न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.